शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नागपुरातील शांतिनगरात गुंडांची दहशत : चाकू हल्ल्यात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:38 IST

जुना वाद उकरून काढत गुंडाच्या एका टोळक्याने तिघांवर चाकू हल्ला केला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगर लोधीपुऱ्यात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देआरोपी फरार, पोलिसांकडून शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना वाद उकरून काढत गुंडाच्या एका टोळक्याने तिघांवर चाकू हल्ला केला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगर लोधीपुऱ्यात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.शुभम बाबू वर्मा (वय २५), त्याचा आतेभाऊ रोशन वर्मा आणि गोलू वर्मा अशी जखमींची नावे आहेत. फिर्यादी शुभम वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचा आतेभाऊ रोशन हे दोघे रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरासमोर बोलत उभे असताना आरोपी अनुज पाठक, छोटू गौरकर, निखील गौरकर, शैलेश पुरी आणि पवन वर्मा तसेच भिजू नावाचा त्यांचा साथीदार तेथे आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी वर्माकडून आरोपींची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तो वाद उकरून काढून आरोपी अनुज पाठक याने शुभमसोबत वाद घातला. ते शुभमला मारहाण करत असल्याचे पाहून गोलू वर्मा धावला. आरोपीने त्यालाही मारहाण केली. त्यामुळे रोशन मदतीला आला असता आरोपी अनुज पाठक याने चाकू काढला. धोका लक्षात घेऊन शुभम, गोलू आणि रोशन या तिघांनी तेथून पळ काढला असता आरोपीने त्यांचा पाठलाग करून त्यांना कन्हेर बाबा मठाच्या समोर गाठले. शुभमच्या जांघेवर तसेच रोशनच्या मागच्या बाजूला आणि गोलूच्या हातावर चाकू मारून आरोपीने या तिघांना जबर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याचे पाहून आरोपींनी पळ काढला. माहिती कळताच शांतिनगर पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी आरोपींची रात्रभर शोधाशोध केली. मात्र आरोपी हाती लागले नाही. शुभम वर्माच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर