शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वन्यप्रेमींसाठी खूशखबर; अमरावतीच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 07:30 IST

Nagpur News अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता असून, वन्यजीव मंडळाने शक्यता तपासण्यासाठी उपसमिती तयार केली आहे.

ठळक मुद्देशक्यता तपासण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची समिती

आशिष राॅय

नागपूर : राज्य वन्यजीव मंडळाकडून विदर्भातील वन्यजीवप्रेमींसाठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता असून, वन्यजीव मंडळाने शक्यता तपासण्यासाठी उपसमिती तयार केली आहे. वरूड-पांढुर्णा राेडवर असलेले महेंद्री अभयारण्य ६५ चाैरस किमीमध्ये पसरले आहे. २०२१च्या मध्यापर्यंत येथे चार वाघ हाेते; पण त्यानंतर त्यातील एक वाघ गायब झाला.

राज्य मंडळाने तयार केलेल्या उपसमितीमध्ये अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) हे अध्यक्ष, तर इतर सदस्यांमध्ये किशाेर रिठे, यादव तरटे पाटील व अमरावतीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) यांचा समावेश आहे. समितीला दाेन महिन्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे अहवाल सादर करायचा आहे.

समितीच्या सदस्यांना महेंद्रीजवळ असलेल्या स्थानिकांची चर्चा करून अभयारण्य घाेषित झाल्यास त्यांच्या गरजा प्रभावित तर हाेणार नाही, याचा अभ्यास करायचा आहे. अडथळा असल्यास काय ताेडगा काढता येईल, याबाबतही सुचवायचे आहे. अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डाॅ. सावन देशमुख यांनी राज्य मंडळाचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे सांगत यामुळे महेंद्री वनक्षेत्र वाचविण्यास मदत हाेईल, असा विश्वास व्यक्त केला.

हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे व ब्रिटिशांनीही हे सत्य जाणले हाेते. प्रादेशिक वन अधिकाऱ्यांना येथील जैवविविधतेचे संवर्धन करणे कठीण हाेते. मागील पावसाळ्यात येथील एक वाघही गायब झाला आणि प्रशासनाने त्याला शाेधण्याची तसदीही घेतली नाही. अभयारण्य झाल्यास या समस्या दूर हाेतील, असा त्यांना विश्वास आहे. मागील सप्टेंबरमध्ये गुजरात वनविभागाने चार शिकाऱ्यांना अटक केली हाेती, ज्यामधील एक महेंद्री क्षेत्रात सक्रिय हाेता. ताे येथील दुर्मीळ प्राण्यांच्या शिकारीमध्ये लिप्त हाेता. शिवाय स्थानिकांद्वारे या वनक्षेत्रातून माेठ्या प्रमाणात जळाऊ लाकडे, तेंदूपत्ता, बांबू आदींची चाेरी केली जाते. अवैध मासेमारीही जाेरात आहे. यावर आळा बसेल. वनक्षेत्राजवळ असलेल्या सात-आठ गावांनाही पुनर्वसनाची इच्छा असून, राज्य शासनाचा निर्णय त्यांना मान्य असल्याचा दावा डाॅ. देशमुख यांनी केला.

टॅग्स :wildlifeवन्यजीव