शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

वन्यप्रेमींसाठी खूशखबर; अमरावतीच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 07:30 IST

Nagpur News अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता असून, वन्यजीव मंडळाने शक्यता तपासण्यासाठी उपसमिती तयार केली आहे.

ठळक मुद्देशक्यता तपासण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची समिती

आशिष राॅय

नागपूर : राज्य वन्यजीव मंडळाकडून विदर्भातील वन्यजीवप्रेमींसाठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता असून, वन्यजीव मंडळाने शक्यता तपासण्यासाठी उपसमिती तयार केली आहे. वरूड-पांढुर्णा राेडवर असलेले महेंद्री अभयारण्य ६५ चाैरस किमीमध्ये पसरले आहे. २०२१च्या मध्यापर्यंत येथे चार वाघ हाेते; पण त्यानंतर त्यातील एक वाघ गायब झाला.

राज्य मंडळाने तयार केलेल्या उपसमितीमध्ये अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) हे अध्यक्ष, तर इतर सदस्यांमध्ये किशाेर रिठे, यादव तरटे पाटील व अमरावतीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) यांचा समावेश आहे. समितीला दाेन महिन्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे अहवाल सादर करायचा आहे.

समितीच्या सदस्यांना महेंद्रीजवळ असलेल्या स्थानिकांची चर्चा करून अभयारण्य घाेषित झाल्यास त्यांच्या गरजा प्रभावित तर हाेणार नाही, याचा अभ्यास करायचा आहे. अडथळा असल्यास काय ताेडगा काढता येईल, याबाबतही सुचवायचे आहे. अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डाॅ. सावन देशमुख यांनी राज्य मंडळाचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे सांगत यामुळे महेंद्री वनक्षेत्र वाचविण्यास मदत हाेईल, असा विश्वास व्यक्त केला.

हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे व ब्रिटिशांनीही हे सत्य जाणले हाेते. प्रादेशिक वन अधिकाऱ्यांना येथील जैवविविधतेचे संवर्धन करणे कठीण हाेते. मागील पावसाळ्यात येथील एक वाघही गायब झाला आणि प्रशासनाने त्याला शाेधण्याची तसदीही घेतली नाही. अभयारण्य झाल्यास या समस्या दूर हाेतील, असा त्यांना विश्वास आहे. मागील सप्टेंबरमध्ये गुजरात वनविभागाने चार शिकाऱ्यांना अटक केली हाेती, ज्यामधील एक महेंद्री क्षेत्रात सक्रिय हाेता. ताे येथील दुर्मीळ प्राण्यांच्या शिकारीमध्ये लिप्त हाेता. शिवाय स्थानिकांद्वारे या वनक्षेत्रातून माेठ्या प्रमाणात जळाऊ लाकडे, तेंदूपत्ता, बांबू आदींची चाेरी केली जाते. अवैध मासेमारीही जाेरात आहे. यावर आळा बसेल. वनक्षेत्राजवळ असलेल्या सात-आठ गावांनाही पुनर्वसनाची इच्छा असून, राज्य शासनाचा निर्णय त्यांना मान्य असल्याचा दावा डाॅ. देशमुख यांनी केला.

टॅग्स :wildlifeवन्यजीव