शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

शुभमंगल सावधान! तेही नियम पाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST

भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे ...

भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे रद्द झाले. मात्र, लग्नकार्य थांबविणे योग्य नसल्यामुळे अनेक पालकांनी ‘शॉर्टकट’ पद्धतीने मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करण्याचा फार्म्यूला वापरला आहे. गत वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे अनेकांचे लग्न थांबले. मुली बघण्याचे आणि दाखविण्याचे कार्यक्रमही थांबले. त्यामुळे मुला-मुलींचे पालक चिंतीत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे मुली बघण्याचा कार्यक्रम लगबगीने सुरू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भाकीत लक्षात घेत अनेकांनी लागल्या हाताने साखरपुढा उरकला. महिनाभराच्या आतच लग्न समारंभाचा बिगुल वाजविला. मात्र, तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे वधू-वर मंडळींनी लग्नासाठी केलेले मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द करावे लागले. नागपूर शहरात कोरोनाची स्थिती भायवह आहे. अशात एकत्रित येणे, गर्दी करणे आणि लग्न लावणे धोक्याची बाब आहे. त्यामुळे अनेकांनी वधू मुलीला वर मंडळीच्या मुक्कामी गावात बोलावून पाच पन्नास आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्न कार्य उरकण्याचा कार्यक्रम चालविला आहे. संसर्गजन्य परिस्थितीत तालुक्यात अनेक गावखेड्यात व शहरात लग्न कार्य पार पडले. मात्र, पाहूण्यांची संख्या कुठे पन्नाशी, तर कुठे शंभरीपार गेलेली नाही. कारण शहर स्तरावर नगरपंचायत व ग्रामपातळीवर ग्रामपंचायतची यंत्रणा गर्दीच्या ठिकाणी कार्यवाही करण्यास सज्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातून कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे अनेकजण शहरातील नातेवाइकांना निमंत्रण देण्याचे टाळत असल्याचे दिसते. गर्दी दिसल्यास, तोंडावर मास्क नसल्यास थेट दंडात्मक कारवाई करा, असा पवित्रा तालुकास्तरीय यंत्रणेने घेतलेला आहे. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, खंडविकास अधिकारी माणिक हिमाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत यांच्या नेतृत्वातील टीम तालुका स्तरावर संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास प्रयत्नरथ आहे.

लग्नाची अखर्चित रक्कम भविष्यासाठी भेट

लग्नकार्यात लाखो रुपयांची उधळपट्टी होते. परिस्थिती नसतानासुद्धा पालकवर्ग उधारवाढ आणि कर्ज काढून मुलीचा विवाह करतात. मुलाकडील मंडळीसुद्धा स्वागत समारोहासाठी लाखो रुपये खर्ची घालतात. मात्र, कोरोनामुळे लग्नात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे होणाऱ्या लाखोंच्या खर्चालासुद्धा लगाम बसला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी लग्नकार्यातील अखर्चित रक्कम विवाहित मुलीच्या व जावयाच्या भविष्यासाठी एफडी किंवा लाईफ इन्शुरन्सच्या रूपाने भेट दिली आहे.