शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल सावधान! तेही नियम पाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST

भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे ...

भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे रद्द झाले. मात्र, लग्नकार्य थांबविणे योग्य नसल्यामुळे अनेक पालकांनी ‘शॉर्टकट’ पद्धतीने मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करण्याचा फार्म्यूला वापरला आहे. गत वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे अनेकांचे लग्न थांबले. मुली बघण्याचे आणि दाखविण्याचे कार्यक्रमही थांबले. त्यामुळे मुला-मुलींचे पालक चिंतीत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे मुली बघण्याचा कार्यक्रम लगबगीने सुरू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भाकीत लक्षात घेत अनेकांनी लागल्या हाताने साखरपुढा उरकला. महिनाभराच्या आतच लग्न समारंभाचा बिगुल वाजविला. मात्र, तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे वधू-वर मंडळींनी लग्नासाठी केलेले मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द करावे लागले. नागपूर शहरात कोरोनाची स्थिती भायवह आहे. अशात एकत्रित येणे, गर्दी करणे आणि लग्न लावणे धोक्याची बाब आहे. त्यामुळे अनेकांनी वधू मुलीला वर मंडळीच्या मुक्कामी गावात बोलावून पाच पन्नास आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्न कार्य उरकण्याचा कार्यक्रम चालविला आहे. संसर्गजन्य परिस्थितीत तालुक्यात अनेक गावखेड्यात व शहरात लग्न कार्य पार पडले. मात्र, पाहूण्यांची संख्या कुठे पन्नाशी, तर कुठे शंभरीपार गेलेली नाही. कारण शहर स्तरावर नगरपंचायत व ग्रामपातळीवर ग्रामपंचायतची यंत्रणा गर्दीच्या ठिकाणी कार्यवाही करण्यास सज्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातून कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे अनेकजण शहरातील नातेवाइकांना निमंत्रण देण्याचे टाळत असल्याचे दिसते. गर्दी दिसल्यास, तोंडावर मास्क नसल्यास थेट दंडात्मक कारवाई करा, असा पवित्रा तालुकास्तरीय यंत्रणेने घेतलेला आहे. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, खंडविकास अधिकारी माणिक हिमाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत यांच्या नेतृत्वातील टीम तालुका स्तरावर संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास प्रयत्नरथ आहे.

लग्नाची अखर्चित रक्कम भविष्यासाठी भेट

लग्नकार्यात लाखो रुपयांची उधळपट्टी होते. परिस्थिती नसतानासुद्धा पालकवर्ग उधारवाढ आणि कर्ज काढून मुलीचा विवाह करतात. मुलाकडील मंडळीसुद्धा स्वागत समारोहासाठी लाखो रुपये खर्ची घालतात. मात्र, कोरोनामुळे लग्नात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे होणाऱ्या लाखोंच्या खर्चालासुद्धा लगाम बसला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी लग्नकार्यातील अखर्चित रक्कम विवाहित मुलीच्या व जावयाच्या भविष्यासाठी एफडी किंवा लाईफ इन्शुरन्सच्या रूपाने भेट दिली आहे.