शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अच्छे दिन आने वाले हैं..

By admin | Updated: May 16, 2014 00:41 IST

सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली ..

बाजारपेठांमध्ये उत्साह : किरकोळ व्यवसायाला गती मिळेल

नागपूर : सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली मरगळ दूर होईल आणि व्यवसायाची नवे दालने खुली होतील, असा सूर उद्योजक आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना काढला. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठांमधील किराणा, धान्य, खाद्य तेल, रेडिमेड वस्त्र, कापड व्यवसाय, लोखंड बाजार, हार्डवेअर, पेंट, प्लॅस्टिक आदींसह सर्व बाजारपेठांमध्ये केंद्रात नवे सरकार येण्याच्या वृत्ताने उत्साहाचे वातावरण आहे.

व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत

निवडणूकपूर्व विश्लेषणे खरी ठरल्यास एनडीएला घोषणापत्रानुसार आश्‍वासने पूर्ण करावी लागतील. व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत, असे मत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे कॅटच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. याशिवाय किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूकदारांना स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या वक्तव्यानुसार एनडीए सरकार सत्तेत आल्याने किरकोळ व्यवसायात ‘अच्छे दिन आने वाले है’ असेच म्हणता येईल, असे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. एनडीए सरकार देशातील किरकोळ व्यापार्‍यांच्या बाजूने राहील. देशातील किरकोळ व्यापारी अतिशय सक्षम आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाने ते व्यवसाय करण्यास अधिक दक्ष होतील. त्यांच्यासाठी काही विशेष धोरणे राबविण्याची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

सराफा व्यवसायात भरभराट

गेल्या काही वर्षांपासून सोन्याचा व्यवसाय मंदीत आला आहे. वाढीव आयात शुल्क हे मुख्य कारण आहे. हे शुल्क रद्द करावे, अशी मागणी देशातील सर्वच सराफा संघटनांनी नेहमीच लावून धरली होती. पण हा कर अजूनही आकारला जात आहे. सराफा व्यवसायाच्या वाढीसाठी सकारात्मक शासकीय धोरणाची गरज आहे. व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे एनडीए सरकार आयात शुल्क रद्द करेल आणि सराफा व्यवसायात पुन्हा भरभराट येईल, अशी प्रतिक्रिया इतवारी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे यांनी दिली.

निर्यात वाढेल

एनडीए सरकार सत्तेत येण्याच्या वृत्ताने छोट्या-मोठय़ा उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण असून बाजारात उत्साह आहे.गेल्या काही वर्षांपासून उद्योगांवर आलेले मंदीचे वातावरण दूर होईल. याशिवाय वाढलेली आयात दूर होऊन निर्यातीला वाव मिळेल. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसात निश्‍चितच फरक दिसून येईल. केंद्रातील नवीन सरकारमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये होणार्‍या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडी सरकारला निश्‍चितच सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील. त्याचा फायदा उद्योजकांना होईल. बुटीबोरी इंडस्ट्रीजमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे मत बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.