शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन आने वाले हैं..

By admin | Updated: May 16, 2014 00:41 IST

सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली ..

बाजारपेठांमध्ये उत्साह : किरकोळ व्यवसायाला गती मिळेल

नागपूर : सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली मरगळ दूर होईल आणि व्यवसायाची नवे दालने खुली होतील, असा सूर उद्योजक आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना काढला. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठांमधील किराणा, धान्य, खाद्य तेल, रेडिमेड वस्त्र, कापड व्यवसाय, लोखंड बाजार, हार्डवेअर, पेंट, प्लॅस्टिक आदींसह सर्व बाजारपेठांमध्ये केंद्रात नवे सरकार येण्याच्या वृत्ताने उत्साहाचे वातावरण आहे.

व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत

निवडणूकपूर्व विश्लेषणे खरी ठरल्यास एनडीएला घोषणापत्रानुसार आश्‍वासने पूर्ण करावी लागतील. व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत, असे मत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे कॅटच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. याशिवाय किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूकदारांना स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या वक्तव्यानुसार एनडीए सरकार सत्तेत आल्याने किरकोळ व्यवसायात ‘अच्छे दिन आने वाले है’ असेच म्हणता येईल, असे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. एनडीए सरकार देशातील किरकोळ व्यापार्‍यांच्या बाजूने राहील. देशातील किरकोळ व्यापारी अतिशय सक्षम आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाने ते व्यवसाय करण्यास अधिक दक्ष होतील. त्यांच्यासाठी काही विशेष धोरणे राबविण्याची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

सराफा व्यवसायात भरभराट

गेल्या काही वर्षांपासून सोन्याचा व्यवसाय मंदीत आला आहे. वाढीव आयात शुल्क हे मुख्य कारण आहे. हे शुल्क रद्द करावे, अशी मागणी देशातील सर्वच सराफा संघटनांनी नेहमीच लावून धरली होती. पण हा कर अजूनही आकारला जात आहे. सराफा व्यवसायाच्या वाढीसाठी सकारात्मक शासकीय धोरणाची गरज आहे. व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे एनडीए सरकार आयात शुल्क रद्द करेल आणि सराफा व्यवसायात पुन्हा भरभराट येईल, अशी प्रतिक्रिया इतवारी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे यांनी दिली.

निर्यात वाढेल

एनडीए सरकार सत्तेत येण्याच्या वृत्ताने छोट्या-मोठय़ा उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण असून बाजारात उत्साह आहे.गेल्या काही वर्षांपासून उद्योगांवर आलेले मंदीचे वातावरण दूर होईल. याशिवाय वाढलेली आयात दूर होऊन निर्यातीला वाव मिळेल. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसात निश्‍चितच फरक दिसून येईल. केंद्रातील नवीन सरकारमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये होणार्‍या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडी सरकारला निश्‍चितच सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील. त्याचा फायदा उद्योजकांना होईल. बुटीबोरी इंडस्ट्रीजमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे मत बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.