शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

अच्छे दिन आने वाले हैं..

By admin | Updated: May 16, 2014 00:41 IST

सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली ..

बाजारपेठांमध्ये उत्साह : किरकोळ व्यवसायाला गती मिळेल

नागपूर : सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली मरगळ दूर होईल आणि व्यवसायाची नवे दालने खुली होतील, असा सूर उद्योजक आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना काढला. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठांमधील किराणा, धान्य, खाद्य तेल, रेडिमेड वस्त्र, कापड व्यवसाय, लोखंड बाजार, हार्डवेअर, पेंट, प्लॅस्टिक आदींसह सर्व बाजारपेठांमध्ये केंद्रात नवे सरकार येण्याच्या वृत्ताने उत्साहाचे वातावरण आहे.

व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत

निवडणूकपूर्व विश्लेषणे खरी ठरल्यास एनडीएला घोषणापत्रानुसार आश्‍वासने पूर्ण करावी लागतील. व्यापार्‍यांना संचालित करणारे कायदे नकोत, असे मत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे कॅटच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. याशिवाय किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूकदारांना स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या वक्तव्यानुसार एनडीए सरकार सत्तेत आल्याने किरकोळ व्यवसायात ‘अच्छे दिन आने वाले है’ असेच म्हणता येईल, असे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. एनडीए सरकार देशातील किरकोळ व्यापार्‍यांच्या बाजूने राहील. देशातील किरकोळ व्यापारी अतिशय सक्षम आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाने ते व्यवसाय करण्यास अधिक दक्ष होतील. त्यांच्यासाठी काही विशेष धोरणे राबविण्याची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

सराफा व्यवसायात भरभराट

गेल्या काही वर्षांपासून सोन्याचा व्यवसाय मंदीत आला आहे. वाढीव आयात शुल्क हे मुख्य कारण आहे. हे शुल्क रद्द करावे, अशी मागणी देशातील सर्वच सराफा संघटनांनी नेहमीच लावून धरली होती. पण हा कर अजूनही आकारला जात आहे. सराफा व्यवसायाच्या वाढीसाठी सकारात्मक शासकीय धोरणाची गरज आहे. व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे एनडीए सरकार आयात शुल्क रद्द करेल आणि सराफा व्यवसायात पुन्हा भरभराट येईल, अशी प्रतिक्रिया इतवारी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे यांनी दिली.

निर्यात वाढेल

एनडीए सरकार सत्तेत येण्याच्या वृत्ताने छोट्या-मोठय़ा उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण असून बाजारात उत्साह आहे.गेल्या काही वर्षांपासून उद्योगांवर आलेले मंदीचे वातावरण दूर होईल. याशिवाय वाढलेली आयात दूर होऊन निर्यातीला वाव मिळेल. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसात निश्‍चितच फरक दिसून येईल. केंद्रातील नवीन सरकारमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये होणार्‍या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडी सरकारला निश्‍चितच सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील. त्याचा फायदा उद्योजकांना होईल. बुटीबोरी इंडस्ट्रीजमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे मत बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.