शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

अच्छे दिन केवळ उद्योगपतींचेच

By admin | Updated: April 27, 2015 02:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखविले; परंतु सत्तेवर येताच सर्व आश्वासने फोल ठरली.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखविले; परंतु सत्तेवर येताच सर्व आश्वासने फोल ठरली. गेल्या १० महिन्यांत केंद्र सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती केली नाही. केवळ उद्योगपतींना लाभ पोहोचविणारी ध्येयधोरणेच आखली जात आहेत, त्यामुळे अच्छे दिन केवळ उद्योगपतींचेच आले आहेत, अशी टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह यांनी रविवारी येथे केली. बहुजन समाज पार्टीतर्फे येत्या २ मे रोजी भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपुरात मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन होईल. त्या आंदोलनाच्या तयारीसाठी पक्षाच्या विदर्भस्तरीय मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह झाशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते. खा. वीरसिंह म्हणाले, एकीकडे देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि आपले पंतप्रधान विदेशवारीत मग्न आहेत. देशातील जनतेला भाजपाचा खरा चेहरा आता दिसून आला आहे. त्यामुळेच दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाला सपाटून मारा बसला. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारालासुद्धा पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येसुद्धा भाजपाची अशीच गत होणार असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी वाडी नगर परिषदेतून निवडून आलेल्या बसपा उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. नागोराव जयकर यांनी प्रास्ताविक केले. भाऊ गोंडाणे यांनी संचालन केले. या बैठकीला विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)