शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

विहिरीत उतरताय, सावधान! जीव धोक्यात येऊ शकतो

By निशांत वानखेडे | Updated: July 11, 2023 17:53 IST

१५ दिवसात दोन घटनांमध्ये ५ मृत्यू : आतमध्ये कोणता जीवघेणा गॅस असतो?

नागपूर : सोमवारी गोंदियाच्या बिरसोला या गावी विहिरीतील मोटरपंप काढायला गेलेल्या शेतकऱ्याचा विषारी वायुमुळे मृत्यू झाला. आठवड्याभरापूर्वीच गोंदिया जिल्ह्याच्या सरांडी गावी विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता. यापूर्वी मध्य प्रदेशातही सेप्टीक टॅंकमध्ये उतरलेल्या चौघांचा जीव गेला होता. अशा घटना वारंवार समोर येत आहेत आणि तरीही लोक दुर्लक्षितपणे मृत्यूला आमंत्रण देतात. विहिरीच्या खोलात असे काय असते, ज्यातून विषारी वायू तयार होतात आणि असे कोणते विषारी वायू असतात की ज्यामुळे मनुष्य क्षणात मृत्यूच्या दाढेत जातो.

यामागचे कारण जाणणे गरजेचे आहे. खुप दिवस बंद असलेल्या किंवा कचरा साचलेल्या विहिरीमध्ये कार्बन मोनाक्साईड व मिथेन ही दोन अत्यंत विषारी वायू तयार होतात. या दोन्ही वायुमुळे तुम्ही काही सेकंदात बेशुद्ध पडू शकता व उपचार झाले नाही तर काही मिनिटातच मृत्यूही ओढवतो. त्यामुळे विहिरीत उतरताना सावधगिरी बाळगा, अन्यथा जीव गेलाच म्हणून समजा. याबाबतचे विशेषज्ञ शरद पालिवाल यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्बन मोनाक्साईड

कार्बन मोनाक्साईड (CO) हा रंगहिन व गंधहिन वायु असून अत्यंत विषारी आहे. वायु, लाकूड किंवा तेल अर्धवट जळले तर त्यातून हा वायु तयार होतो. हा वायु हवेपेक्षा थोडा हलका आहे. विहिर खुप दिवस बंद असल्यास विहिरीत तो तयार होतो. जमिनीतूनही तो येऊ शकतो. विहिरीतील पाण्याची हालचाल होत नसेल किंवा व्हेंटीलेशन मिळत नसल्यास हा वायु हमखास तयार होतो व स्थिरावतो.

मिथेन वायु (Ch4)

मिथेन वायु अत्यंत ज्वलनशील वायु म्हणून ओळखला जातो. आपल्या घरातील गॅस सिलेंडरमध्ये हाच वायु असतो. सडलेला कचरा, मलमुत्र याचे मिश्रणातून तो तयार होतो. गोबरगॅस किंवा बॉयोगॅस हे त्याचे उदाहरण आहे.

हे वायु किती धोकादायक आहेत?

- कार्बन मोनाक्साईड हा वायु कार्बन डायऑक्साईड (CO२) नैसर्गिकरित्या मनुष्याच्या फुप्फूसातून ऑक्सिजन ओढून घेतो. ही क्रिया काही सेकंदातच घडते. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण होऊन मनुष्य गुदमरून बेशुद्ध पडतो. त्वरीत उपचार न केल्यास काही मिनिटात माणूस मृत्यूच्या दाढेत लोटला जातो.

- मिथेन असल्यास शरीरातून ऑक्सिजन शोषून कार्बन डायऑक्साईड तयार करतो. अधिक प्रभावात आल्यास मनुष्य बेशुद्ध पडून काही वेळात मृत्यू पावतो. मात्र कार्बन मोनाक्साईडपेक्षा मिथेन कमी जीवघेणा आहे. प्रमाण कमी असल्यास उपचाराला वेळ मिळू शकतो.

मोटरपंप जळाल्यानेही होते कार्बन मोनाक्साईड

पाण्याच्या मोटरपंप बंद असल्यास किंवा जळाल्यास त्यातूनही कार्बन मोनाक्साईड बाहेर निघतो. त्याच्या उत्सर्जनासाठी प्राणवायु मिळाला नाही तर हा वायु तिथेच स्थिरावतो. नेमकी तिच मोटार दुरुस्तीसाठी गेल्यास धोक्याची शक्यता खुप जास्त असते.

विहिरीत उतरण्यापूर्वी काय करावे?

- एकतर सुरक्षेचे पूर्ण साहित्य असतील तरच विहिरीत उतरावे, अन्यथा उतरूच नये.

- बंद विहिरीत उतरण्यापूर्वी आधी जळता दिवा किंवा पेटती काडी सोडावी. दिवा किंवा काडी विझल्यास येथे कार्बन मोनाक्साईड असेल किंवा आगीचा भपका घेतल्यास मिथेन आहे, असे समजावे.- त्यानंतर व्हेंटीलेशन, पाण्याची हालचाल व पूर्ण उपाय करूनच विहिरीत उतरावे.

टॅग्स :environmentपर्यावरण