शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पक्ष्यांसाठी जयपुरात नागपूरचे डाॅक्टर ठरले देव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:13 IST

Nagpur News मांजाने जायबंदी झालेल्या पक्ष्यांसाठी सहा डाॅक्टरांची टीम देवासारखी ठरली आणि यात नागपूरच्याही तीन डाॅक्टरांचा समावेश हाेता, हे महत्त्वाचे.

ठळक मुद्दे३०० च्या वर जखमी पक्ष्यांना जीवदान पीपीई कीट घालूनच उपचार

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : देशभरातील मकरसंक्रांतीचा उत्साह पक्ष्यांच्या जिवावर बेतला. गुजरातसह राजस्थानच्या जयपूरमध्येही पतंगबाजीचा उत्साह शिगेला पाेहोचलेला असताे. यावर्षीही ताे हाेता व यावेळीही शेकडाे गगनविहारी पतंगांच्या मांजाचे बळी ठरले. मात्र शेकडाेंच्या संख्येने जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचारही झाला. मांजाने जायबंदी झालेल्या या पक्ष्यांसाठी सहा डाॅक्टरांची टीम देवासारखी ठरली आणि यात नागपूरच्याही तीन डाॅक्टरांचा समावेश हाेता, हे महत्त्वाचे.

डाॅ. उष्मा पटेल, डाॅ. चेतन पाताेंड व डाॅ. ऐश्वर्या बेतगिरी अशी या पशुवैद्यक तज्ज्ञांची नावे आहेत. वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि रक्षा फाऊंडेशन यांच्यावतीने दरवर्षी मकरसंक्रांतीच्या काळात जखमी पक्ष्यांसाठी उपचार केंद्र लावण्यात येते. डाॅ. उष्मा पटेल यांना दरवर्षी सेवा देण्यास बाेलावण्यात येते. यावर्षीचा अनुभव मात्र वेगळा ठरल्याचे त्या म्हणाल्या. काेराेनामुळे संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागली. पक्ष्यांच्या उपचारासाठी सतत पीपीई कीट घालून राहावे लागत असल्याने काम त्रासदायक हाेते. मात्र या परिस्थितीत डाॅक्टरांच्या पथकाने ३०० च्या वर जखमी पक्ष्यांवर उपचार केले. यातील निम्म्यापेक्षा जास्त पक्ष्यांना शस्त्रक्रिया करून वाचविण्यात आल्याचे डाॅ. उष्मा यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

मानवाप्रमाणे पक्ष्यांवरही शस्त्रक्रिया करताना भूल देणे गरजेचे असते. काही पक्ष्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. विशेषत: गळ्याला दुखापत झालेल्या पक्ष्यांसाठी त्याची व्यवस्था करण्यात आली. अधिक गंभीर पक्ष्यांसाठी ऑक्सिजन लेव्हलचा समताेल राखणेही महत्त्वाचे असल्याचे डाॅ. उष्मा यांनी सांगितले. गळ्याला जखम झालेला माेर, गरुड, विविध प्रजातींची घुबडे, कार्माेरांट, लॅपविंग, पानकाेंबळी, किंगफिशर, काॅमन बझार्ड, कुकल, कबुतर अशा १५० वर पक्ष्यांच्या शस्त्रक्रिया केल्या.

काेराेना, एन्फ्लुएंजाचे आव्हान

दुसरीकडे बर्ड फ्लू व एन्फ्लुएंजाचेही आव्हान डाॅक्टरांसमाेर हाेते. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांशिवाय प्रवासी पक्षी व अभयारण्यातील पक्ष्यांवर विशेष भर देण्यात आला. एन्फ्लुएंजाचा प्रादुर्भाव हाेऊ लागल्याने जयपूरचे प्राणीसंग्रहालयही बंद ठेवण्यात आले हाेते. त्यामुळेही आव्हान माेठे हाेते. त्यामुळे सतत पीपीई कीट घालून विशेष काळजी घ्यावी लागल्याचे डाॅ. उष्मा म्हणाल्या.

उष्मा यांच्या ३५०० वर शस्त्रक्रिया

डाॅ. उष्मा पटेल यांना दरवर्षी गुजरात किंवा जयपूरला पाचारण करण्यात येते. गेल्या काही वर्षांत डाॅ. उष्मा यांनी ३५०० वर जखमी पक्ष्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले आहे. नागपुरातही जखमी पक्ष्यांसाठी त्यांची सेवा सुरू असते.

टॅग्स :Healthआरोग्य