शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

चूक दुरुस्तीसाठी ‘मुंबई’ला जा! ‘यूआयडीएआय’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:22 IST

शासनाने बहुतांश सर्वच महत्त्वाच्या बाबींसाठी आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे. या कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेत व मूळ जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा अधिक तफावत असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला मुंबई येथील विभागीय कार्यालयात जावे लागणार आहे. हा निर्णय ‘युनिक आयडेन्टीफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) अर्थात ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने घेतला असून, याबाबत सहा महिन्यांपूर्वीच तहसील कार्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात अले आहे. या निर्णयामुळे संबंधित व्यक्तींची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

ठळक मुद्देमहत्त्वाच्या बाबींसाठी आधार कार्डची नितांत गरज

राम वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (नांद) : शासनाने बहुतांश सर्वच महत्त्वाच्या बाबींसाठी आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे. या कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेत व मूळ जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा अधिक तफावत असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला मुंबई येथील विभागीय कार्यालयात जावे लागणार आहे. हा निर्णय ‘युनिक आयडेन्टीफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) अर्थात ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने घेतला असून, याबाबत सहा महिन्यांपूर्वीच तहसील कार्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात अले आहे. या निर्णयामुळे संबंधित व्यक्तींची डोकेदुखी मात्र वाढली आहे.शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून तर बँकांमध्ये खाते उघडण्यापर्यंत महत्त्वाच्या बाबींसाठी ‘आधार कार्ड क्रमांक’ अनिवार्य केला आहे. नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी शासनाने ‘युनिक आयडेन्टीफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ची निर्मितीही केली. त्यासाठी विशेष मोहीम राबवून गावोगाव शिबिराचे आयोजन केले होते. सुरुवातीच्या काळात आधार कार्ड तयार करताना काहीसे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. काही अशिक्षित नागरिकांनी त्यांची जन्मतारीख, महिना व वर्ष सांगताना गफलत केली, तर काहींनी खरी माहिती दिली.मात्र, अनेकांच्या आधार कार्डमध्ये नमूद असलेल्या माहितीमध्ये चुका असल्याचे प्रकारही चव्हाट्यावर आले. यात सर्वाधिक घोळ जन्मतारखेत झाल्याचे दिसून आले. वास्तवात, बहुतांश चुका ‘यूआयडीएआय’अंतर्गत काम करणाऱ्यांच्या असतानाही त्याचे खापर नागरिकांच्या माथी फोडण्यात आले. पुढे त्या चुका दुरुस्त करण्याची सोय करण्यात आली. यातील काही चुका स्थानिक सेवा केंद्रात आणि काही चुका ‘यूआयडीएआय’च्या मुंबई येथील विभागीय कार्यालयात दुरुस्त करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी प्राधिकरणाने घेतला.मूळ जन्मतारीख आणि आधार कार्डवर नमूद असलेली जन्मतारीख यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी तफावत असल्यास ती दुरुस्ती स्थानिक सेवा केंद्रात केली जाईल. तीन वर्षांपेक्षा अधिक तफावत असल्यास त्या दुरुस्तीसाठी संबंधित व्यक्तीला ‘यूआयडीएआय’च्या मुंबई येथील विभागीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. यात ग्रामीण भागातील अशिक्षित व कमी शिक्षित नागरिकांची मोठी गोची झाली आहे.वेळ व पैसा खर्चआधार कार्डवर जन्माचे वर्ष १९९५ नमूद असेल आणि जन्माचे मूळ वर्ष १९९२ ते १९९५ किंवा १९९५ ते १९९८ या दरम्यान असेल तर ही दुरुस्ती स्थानिक आधार कार्ड केंद्रात करता येते. मात्र, जन्माचे मूळ वर्ष १९९२ च्या आधीचे किंवा १९९८ च्या नंतरचे असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला त्यांच्या जन्मतारखेच्या सबळ पुराव्यासह यूआयडीएआय, रिजनल आॅफीस, ७ फ्लोअर, एमटीएनएल एक्सचेंज, जी.डी. सोमाणी मार्ग, कफ परेड कुलाबा, मुंबई येथे जावे लागणार आहे. त्यामुळे या दुरुस्तीसाठी राज्यभरातील संबंधितांना मुंबईची वारी करावी लागणार आहे. सदर काम एक, दोन दिवसात पूर्ण होईल याची खात्री नाही. यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागणार आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी सोय करायात एखादे कागदपत्र कमी असल्यास संबंधिताला गावी परत येऊन मुंबईचे हेलपाटे मारावे लागणार आहे. ही दुरुस्ती न केल्यास त्याचा फटका संबंधित व्यक्तीलाच बसणार आहे. कारण, प्रॉव्हिडंट फंड, निवृत्ती वेतन, निवृत्ती वेतनाचे पाश्चात्य असणारे वारस यांच्या नोंदी यासह अन्य बाबी आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेवर अवलंबून आहे. त्यामुळे या दुरुस्तीची सोय तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी करावी, अशी मागणीही केली जात आहे.आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा बदल करावयाचा असेल तर, संबंधित व्यक्तीला आता ती दुरुस्ती सुधारण्यासाठी मुंबई कार्यालयात जावे लागणार आहे. तशा लेखी सूचनांचे पत्र ‘यूआयडीएआय’कडून थेट आधार केंद्र चालकांना प्राप्त झाले आहे. भिवापूर तालुक्यात त्या सूचनांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. साहेबराव राठोड,तहसीलदार, भिवापूर.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMumbaiमुंबई