शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

कॅनडाला जाण्यासाठी आधी जावे लागते मालदीवला...प्रवासी, विद्यार्थी त्रस्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 10:20 IST

Nagpur News कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट रिपाेर्टच अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपाेर्टसाठी दुसऱ्या देशाची चक्कर मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागताे.

ठळक मुद्देकॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू व्हावी ‘वंदे भारत’ सेवाभारतीय आरटीपीसीआर अमान्य केल्याने मनस्ताप अवाढव्य खर्च करून करावा लागताे प्रवास

 

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कॅनडा सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर अनिश्चित काळासाठी निर्बंध घातले आहेत. कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट रिपाेर्टच अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपाेर्टसाठी दुसऱ्या देशाची चक्कर मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागताे. त्यामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वंदे भारत’ सारखी सेवा सुरू करण्याची मागणी जाेर धरत आहे.   (Vande Bharat service)

यावर्षी एप्रिल महिन्यात भारतातून कॅनडाला गेलेल्या जवळपास सर्वच विमानांमधील अनेक प्रवासी आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपाेर्ट सादर करूनही काेराेना संक्रमित आढळून आले हाेते. अशाने कॅनडातील निर्बंधामुळे प्रवाशांना व विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पुन्हा महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरसकट निर्बंध लादण्याऐवजी कॅनडा प्रशासनाने भारतातील काही रुग्णालयांची निवड करून त्यातील आरटी-पीसीआर रिपाेर्टचा स्वीकार करावा, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

सध्या अमिरात, लुफ्तान्सा आणि फ्रान्सच्या विमानांना कॅनडामध्ये आवागमनाची परवानगी आहे; मात्र भारतातून या देशातील विमानसेवेचा लाभ घेणे अडचणीचे आहे कारण त्यासाठी स्वतंत्र व्हिजा काढावा लागताे. केवळ मालदीव असा देश आहे, जिथे व्हिजा न घेता जाऊन कॅनडाकडे प्रवास करता येताे. त्यामुळे ज्या भारतीयांनी कॅनडा प्रवासाचे नियाेजन केले आहे त्यांना आधी मालदीव गाठावे लागते. तेथून ते कॅनडाकडे प्रवास करतात. मात्र, हा प्रवास अतिशय महागडा ठरताे. कारण त्यांना आधी मालदीवला जाऊन आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठी दाेन-तीन दिवस मुक्काम करावा लागताे आणि त्यानंतरच निगेटिव्ह असल्याचा रिपाेर्ट घेऊन कॅनडाकडे रवाना हाेता येते. हा इतका ससेमिरा आतापर्यंत अनेक भारतीयांना करावा सुद्धा लागला आहे.

विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास न परवडणारा ठरला आहे. पूर्वी भारतातून कॅनडाला थेट जाण्यासाठी ७५,००० रुपये खर्च येत हाेता. मात्र सध्या अशाप्रकारे ससेमिरा करून २.१५ ते २.३० लाख रुपये खर्च करावे लागत असून हा एकाच बाजूचा प्रवास आवाक्याच्या बाहेर जात आहे. कॅनडात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा प्रवास करीत जाणे म्हणजे पालकांच्या खिशाला भगदाड पाडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे ‘वंदे भारत’सारख्या सेवेचे नियाेजन करून काेराेना टेस्ट निगेटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट प्रत्यार्पणासाठी एअर इंडिया व एअर कॅनडामध्ये समन्वय स्थापित करणे आवश्यक असल्याचे सुचविले जात आहे.

त्रयस्थ देशात १४ दिवस क्वारंटाईनची अट

- कॅनडाच्या अधिकृत वेबसाईटनुसार एखादा प्रवासी ट्रान्झिट देशात काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आल्यास त्याला त्रयस्थ देशात १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. त्यामुळे साहजिकच त्या प्रवाशाला क्वारंटाईन काळादरम्यान माेठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागेल; मात्र नकारात्मक चाचणी अहवाल असल्यास दाेन-तीन दिवसात त्यांना देश साेडता येईल.

भारताने कॅनडा सरकारशी चर्चा करावी

- भारतीय विद्यार्थी तसेच सामान्य प्रवाशांचाही विचार करीत केंद्र सरकारने हा विषय गंभीरतेने घेत कॅनडा सरकारशी बाेलून या समस्येतून लवकरात लवकर मार्ग काढण्याची गरज आहे, अशी भावना बहुतेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे. ही भावना देशातील अनेक ट्रॅव्हल एजन्सीची सुद्धा आहे. त्यांनाही दरराेज मनस्ताप सहन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या निराशेचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी