शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

राजकीय व आर्थिक सत्तेशिवाय भाषेची जागतिक गणना अशक्य : महेश एलकुंचवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:12 IST

मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे लक्ष वेधले जाते आणि त्यातील जे काही बरे-वाईट आहे ते स्वीकारले जाते. मात्र ‘आमच्याकडे यातले काहीच नाही आणि आम्हाला नोबेल पाहिजे, कसे शक्य आहे? कोण विचारतो मराठी भाषेला आणि कशाला हवा अभिजात भाषेचा दर्जा?’, असा खोचक सवाल प्रा. एलकुंचवार यांनी केला.

ठळक मुद्देमोहनी व परांजपे यांना भाषाव्रती पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे लक्ष वेधले जाते आणि त्यातील जे काही बरे-वाईट आहे ते स्वीकारले जाते. मात्र ‘आमच्याकडे यातले काहीच नाही आणि आम्हाला नोबेल पाहिजे, कसे शक्य आहे? कोण विचारतो मराठी भाषेला आणि कशाला हवा अभिजात भाषेचा दर्जा?’, असा खोचक सवाल प्रा. एलकुंचवार यांनी केला.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने देण्यात येणारा प्रा. राम शेवाळकर भाषाव्रती पुरस्कार भाषाविषयक क्षेत्रात गेल्या ५० पेक्षा जास्त वर्षांपासून कार्य करणारे अभ्यासक आणि संपादक प्रा. प्र. ना. परांजपे आणि दिवाकर मोहनी यांना प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या देवधर, कार्यवाह इंद्रजित ओरके, विलास मानेकर तसेच भाष्यकार म्हणून डॉ. विजया देव आणि सुरेखा देवघरे उपस्थित होत्या. प्रा. महेश एलकुंचवार यांनी आपल्या चिरपरिचित शैलीपेक्षा वेगळे आणि अत्यंत खुशखुशीत शैलीत संवाद साधला. काही नवलेखकांच्या साहित्याचा उल्लेख करीत आपलीच मराठी खराब झाल्यासारखी वाटत असल्याची कोटी केली. अनावश्यक प्रतिभाविलास करताना आपण इतक्या अशुद्ध, वाईट, ढिसाळ व बेजबाबदारपणाने लिहितो, असे यांना जाणवत नाही. आपली भाषा चांगली लिहिता व बोलता न येणे, हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे कुणालाही वाटत नाही. त्यामुळे येणाऱ्या १५-२० वर्षांनी आताची मराठी ओळखीचीच राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली.प्रा. एलकुंचवार यांनी वर्गमित्र असलेले दिवाकर मोहनी तसेच प्रा. प्र. ना. परांजपे यांच्याविषयीची मैत्री मनोगत अतिशय खेळकरपणाने मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला. दररोज भेटलोच आणि बोललोच पाहिजे, म्हणजे मैत्री असते, असे नव्हे. जगात काहीच नष्ट होत नाही. उद्या आम्ही नसलो तरी आमच्या मैत्रीचे घटीत कुठेतरी व्यक्त होईल, कुणालातरी स्पर्श करेल, असे भावनामय मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ. विद्या देवधर यांनी, केवळ आपली भाषा करून चालणार नाही तर विविध भाषांचे ज्ञान अंगिकारण्याची गरज व्यक्त केली. भाषेसाठी व्रतस्थपणे कार्य करणाऱ्यांप्रति आपले काही देणे आहे, यामुळे या दोन महनीय व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करीत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. विजया देव यांनी प्रा. परांजपे आणि सुरेखा देवघरे यांनी मोहनी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. संचालन विवेक अलोणी व सुषमा मुलमुले यांनी केले. साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी आभार मानले.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य