शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर द्या : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:31 IST

मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर, भंडारा, रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देभाजपाच्या शक्तीप्रमुख संमेलनात निवडणुकांच्या तयारीवर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर, भंडारा, रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनादरम्यान ते बोलत होते.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित केले. केंद्र सरकारने कधीही कुठलीही योजना राबविताना भेदभाव केला नाही. दीक्षाभूमी व ड्रॅगन टेम्पलचा विकास केला. गरिबांचे जीवन सुसह्य केले. हे सर्व लाभ देताना कोणताही भेदभाव न करता दिले. कुणाचीही जात विचारून हे लाभ दिले नाही. सबका साथ सबका विकास या धोरणाने आपण काम केले. मात्र असे असतानादेखील भाजपावर जातीयवादी असल्याचा आरोप लावण्यात येतो. येत्या लोकसभा निवडणुकांतील विजय हा कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, असे गडकरी म्हणाले.विकास कामांमध्ये आपण आज कुठेही कमी नाही. पण संघटनेत मात्र कार्यकर्त्यांचे संबंध कसे असावेत हे आपण जाणले पाहिजे. नवीन माणसे उभी करा, सर्व समाजातील सर्व कार्यकर्त्यांना यथोचित सन्मान मिळाला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.कठोर निर्णय पक्षहितासाठी असतातपक्षाचे काम करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते पक्षाच्या हितासाठी घ्यावे लागतात. काही वेळा कार्यकर्ते नाराज होतात, मात्र तीच खरी परीक्षा असते. युध्दात सैनिक शस्त्रापेक्षा मनाने लढतो. त्यासाठी आधी मनस्थिती बनवून घ्यावी लागते. मने जुळली तर युध्द जिंकता येते. बाहेरून आलेल्या लोकांनादेखील आपल्यासारखे बनविले पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.समृद्धी महामार्ग आता गोंदियापर्यंतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग झाल्यानंतर गोंदियापासून ते मुंबईपर्यंतचे अंतर केवळ सात तासात कापता येईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. रामटेक, नागपूर, भंडारा गोंदियाच्या प्रत्येक शक्तीकेंद्र प्रमुखाने ७०० तर बूथप्रमुखाने १५० घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.अनुपस्थित केंद्रप्रमुखांची मागविली नावेसंमेलनादरम्यान संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांनी विधानसभानिहाय शक्तीकेंद्र प्रमुखांची हजेरीच घेतली. अनुपस्थित असलेल्या केंद्रप्रमुखांची नावे त्यांनी मंडळ अध्यक्षांकडून मागविली आहेत. गोंदिया शहरातील २२ पैकी केवळ सात प्रमुखच सभागृहात उपस्थित होते.राहुल स्वत:ला लोकशाहीहून मोठे समजतात : रावतयावेळी त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी स्वत:ला लोकशाहीहून मोठे मानतात. राफेल विमान करारात सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतरदेखील ते त्या मुद्द्यावर अडून बसले आहेत, असे रावत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने भारताची ओळख सर्व जगात करून दिली. डोकलाममधून चीनला हुसकावून लावले व काश्मीर प्रश्न चिघळू दिला नाही. आज तेथील भ्रष्टाचार अखेरचा श्वास घेत आहे, असा दावा त्यांनी केला.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीElectionनिवडणूक