शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर द्या : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:31 IST

मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर, भंडारा, रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देभाजपाच्या शक्तीप्रमुख संमेलनात निवडणुकांच्या तयारीवर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर, भंडारा, रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनादरम्यान ते बोलत होते.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित केले. केंद्र सरकारने कधीही कुठलीही योजना राबविताना भेदभाव केला नाही. दीक्षाभूमी व ड्रॅगन टेम्पलचा विकास केला. गरिबांचे जीवन सुसह्य केले. हे सर्व लाभ देताना कोणताही भेदभाव न करता दिले. कुणाचीही जात विचारून हे लाभ दिले नाही. सबका साथ सबका विकास या धोरणाने आपण काम केले. मात्र असे असतानादेखील भाजपावर जातीयवादी असल्याचा आरोप लावण्यात येतो. येत्या लोकसभा निवडणुकांतील विजय हा कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, असे गडकरी म्हणाले.विकास कामांमध्ये आपण आज कुठेही कमी नाही. पण संघटनेत मात्र कार्यकर्त्यांचे संबंध कसे असावेत हे आपण जाणले पाहिजे. नवीन माणसे उभी करा, सर्व समाजातील सर्व कार्यकर्त्यांना यथोचित सन्मान मिळाला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.कठोर निर्णय पक्षहितासाठी असतातपक्षाचे काम करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते पक्षाच्या हितासाठी घ्यावे लागतात. काही वेळा कार्यकर्ते नाराज होतात, मात्र तीच खरी परीक्षा असते. युध्दात सैनिक शस्त्रापेक्षा मनाने लढतो. त्यासाठी आधी मनस्थिती बनवून घ्यावी लागते. मने जुळली तर युध्द जिंकता येते. बाहेरून आलेल्या लोकांनादेखील आपल्यासारखे बनविले पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.समृद्धी महामार्ग आता गोंदियापर्यंतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग झाल्यानंतर गोंदियापासून ते मुंबईपर्यंतचे अंतर केवळ सात तासात कापता येईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. रामटेक, नागपूर, भंडारा गोंदियाच्या प्रत्येक शक्तीकेंद्र प्रमुखाने ७०० तर बूथप्रमुखाने १५० घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.अनुपस्थित केंद्रप्रमुखांची मागविली नावेसंमेलनादरम्यान संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांनी विधानसभानिहाय शक्तीकेंद्र प्रमुखांची हजेरीच घेतली. अनुपस्थित असलेल्या केंद्रप्रमुखांची नावे त्यांनी मंडळ अध्यक्षांकडून मागविली आहेत. गोंदिया शहरातील २२ पैकी केवळ सात प्रमुखच सभागृहात उपस्थित होते.राहुल स्वत:ला लोकशाहीहून मोठे समजतात : रावतयावेळी त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी स्वत:ला लोकशाहीहून मोठे मानतात. राफेल विमान करारात सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतरदेखील ते त्या मुद्द्यावर अडून बसले आहेत, असे रावत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने भारताची ओळख सर्व जगात करून दिली. डोकलाममधून चीनला हुसकावून लावले व काश्मीर प्रश्न चिघळू दिला नाही. आज तेथील भ्रष्टाचार अखेरचा श्वास घेत आहे, असा दावा त्यांनी केला.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीElectionनिवडणूक