शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या; प्रवासी संघटनेची मागणी

By नरेश डोंगरे | Updated: April 9, 2024 19:18 IST

प्रत्येक कोचमध्ये गार्ड नेमा, प्रवासी संघटनेची मागणी : रेल्वे बोर्ड, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नियुक्त करा, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे बोर्डाच्या दिल्लीतील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अलिकडे नागपूर स्थानकावरून विविध मार्गावर धावणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी प्रचंड गर्दी करीत आहेत. खास करून राप्ती सागर एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम, गोरखपूर एक्सप्रेस, हैदराबाद, हावडा, मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, जयपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आधीच पाय ठेवायला जागा नसताना प्रवासी त्यात बसण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. या संबंधाने दोन दिवसांपूर्वी 'लोकमत'ने सचित्र वृत्तही प्रकाशित केले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह रेल्वे बोर्डाच्या शिर्षस्थांना पत्र लिहून त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. पत्रातून त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे गाडीची प्रवासी क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्यात गाडीत कोणताही अतिरिक्त प्रवासी चढू नये, यासाठी ड्युटीवर असलेल्या टीटीई तसेच स्टेशन स्टाफला तिकिट बनवू नये, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र, उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सामान्य श्रेणीच्या प्रवाशांना स्लिपरचे तिकिट देऊन त्यांना स्लिपर कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येते. परिणामी त्या कोचमध्ये अतिरिक्त गर्दी होते. त्याचा फटका आरक्षण करून कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो. त्यांना अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा त्रास होतो.

कुठेच जागा नसल्याने ही मंडळी टॉयलेटजवळ बसतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची तीव्र कुचंबना होते. हे सर्व टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश देण्याची आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नेमण्याची मागणी शुक्ला यांनी या पत्रातून केली आहे.दखल घेणार का ?प्रवासी संघटनेकडून करण्यात आलेल्या या मागणीची रेल्वे बोर्ड किंवा मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून किती तत्परतेने आणि कशा प्रकारे दखल घेतली जाते, त्याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे