शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या; प्रवासी संघटनेची मागणी

By नरेश डोंगरे | Updated: April 9, 2024 19:18 IST

प्रत्येक कोचमध्ये गार्ड नेमा, प्रवासी संघटनेची मागणी : रेल्वे बोर्ड, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नियुक्त करा, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे बोर्डाच्या दिल्लीतील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अलिकडे नागपूर स्थानकावरून विविध मार्गावर धावणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी प्रचंड गर्दी करीत आहेत. खास करून राप्ती सागर एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम, गोरखपूर एक्सप्रेस, हैदराबाद, हावडा, मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, जयपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आधीच पाय ठेवायला जागा नसताना प्रवासी त्यात बसण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. या संबंधाने दोन दिवसांपूर्वी 'लोकमत'ने सचित्र वृत्तही प्रकाशित केले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह रेल्वे बोर्डाच्या शिर्षस्थांना पत्र लिहून त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. पत्रातून त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे गाडीची प्रवासी क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्यात गाडीत कोणताही अतिरिक्त प्रवासी चढू नये, यासाठी ड्युटीवर असलेल्या टीटीई तसेच स्टेशन स्टाफला तिकिट बनवू नये, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र, उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सामान्य श्रेणीच्या प्रवाशांना स्लिपरचे तिकिट देऊन त्यांना स्लिपर कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येते. परिणामी त्या कोचमध्ये अतिरिक्त गर्दी होते. त्याचा फटका आरक्षण करून कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो. त्यांना अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा त्रास होतो.

कुठेच जागा नसल्याने ही मंडळी टॉयलेटजवळ बसतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची तीव्र कुचंबना होते. हे सर्व टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश देण्याची आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नेमण्याची मागणी शुक्ला यांनी या पत्रातून केली आहे.दखल घेणार का ?प्रवासी संघटनेकडून करण्यात आलेल्या या मागणीची रेल्वे बोर्ड किंवा मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून किती तत्परतेने आणि कशा प्रकारे दखल घेतली जाते, त्याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे