शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सेवा द्या : अभय बंग यांचे डॉक्टरांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 20:57 IST

आज आपल्याला जी पदवी बहाल करण्यात आली आहे, तिच्या मागची बाजू कोरी आहे. त्यावर काय लिहायचे ते आपल्या हातात आहे. हातातील अंगठी अंधारात पडली असताना, उजेडात शोधण्याला अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे जिथे साधने उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपली सेवा देऊन आपणच व्यवस्थेत अडथळा बनतो. यापेक्षा जिथे साधने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी सेवा दिल्यास समोरच्याला फायदा होतोच, आपल्याला समाधान मिळते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक आणि 'सर्च' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देमेयोमध्ये दीक्षांत सोहळा साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज आपल्याला जी पदवी बहाल करण्यात आली आहे, तिच्या मागची बाजू कोरी आहे. त्यावर काय लिहायचे ते आपल्या हातात आहे. हातातील अंगठी अंधारात पडली असताना, उजेडात शोधण्याला अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे जिथे साधने उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपली सेवा देऊन आपणच व्यवस्थेत अडथळा बनतो. यापेक्षा जिथे साधने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी सेवा दिल्यास समोरच्याला फायदा होतोच, आपल्याला समाधान मिळते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक आणि 'सर्च' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांनी येथे व्यक्त केले.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (मेयो) दीक्षांत सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. रसिका गडकरी, विभाग प्रमुख डॉ.अशोक जाधव, डॉ. सुनील राऊत, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. कुरेशी, उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.डॉ. बंग म्हणाले, पदवी प्राप्त झाल्यामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे. समाजाला काही परत करायचे आहे, या भावनेने डॉक्टरांनी काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. डॉ. केवलिया यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या कर्तृत्वामधून महाविद्यालयाचे नाव मोठे होईलच, अशी अपेक्षाही व्यक्त केली.या सोहळ्यात १३० विद्यार्थ्यांना एमबीबीएसची पदवी प्रदान करण्यात आली. संचालन डॉ. अजित बोंदरे व डॉ. सानिया यांनी केले तर आभार डॉ. ऋतुजा मेश्राम व डॉ. स्वाती सिमरन यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता. कार्यक्रमाची सुरुवात पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इन्टर्नस’ महाराष्ट्रचे सहसचिव डॉ. संजय बन्सल, डॉ. ऋतुजा मेश्राम, डॉ. अनूप शिवलानी, डॉ. स्वाती सिमरन, डॉ. सुचिता कुंभारे, डॉ. पल्लवी झामरे, डॉ. गोपाल उभाळ, डॉ. नेहा जेसवानी आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर