शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

शेतमजुरांना रोहयोंतर्गत शेतातील कामे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST

काटोल : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी ...

काटोल : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी लाभ घेऊ शकतो अशी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय. या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतो. परंतु या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तेव्हाच होईल जेव्हा शेतात राबणाऱ्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होईल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत शेतातील कामे द्या, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी निरंजन राऊत यांनी केली आहे. काटोल तालुक्यात गत दोन वर्षापासून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यंदा तरी शेतपीक चांगले होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु सोयाबीन अगदी सुरुवातीलाच किडीने फस्त केले. संत्रा, मोसंबी पिकाला गळू लागल्याने मोठे नुकसान झाले. कपाशीला बोंडअळीचा फटका बसतो आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानभरपाईची घोषणा केली जाते. कधी कर्जमाफी दिली जाते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला याचा फायदा होताना दिसत नाही. रोजगार हमी योजनेंतर्गतसुद्धा असाच काहीसा प्रकार सुरू आहे. यात आता सुधारणा होणे गरजेचे आहे.