शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांना रोहयोंतर्गत शेतातील कामे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST

काटोल : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी ...

काटोल : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी लाभ घेऊ शकतो अशी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय. या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतो. परंतु या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तेव्हाच होईल जेव्हा शेतात राबणाऱ्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होईल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत शेतातील कामे द्या, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी निरंजन राऊत यांनी केली आहे. काटोल तालुक्यात गत दोन वर्षापासून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यंदा तरी शेतपीक चांगले होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु सोयाबीन अगदी सुरुवातीलाच किडीने फस्त केले. संत्रा, मोसंबी पिकाला गळू लागल्याने मोठे नुकसान झाले. कपाशीला बोंडअळीचा फटका बसतो आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानभरपाईची घोषणा केली जाते. कधी कर्जमाफी दिली जाते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला याचा फायदा होताना दिसत नाही. रोजगार हमी योजनेंतर्गतसुद्धा असाच काहीसा प्रकार सुरू आहे. यात आता सुधारणा होणे गरजेचे आहे.