शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

प्रत्येकाला किमान गरजेइतके पाणी द्या!

By admin | Updated: November 26, 2014 01:06 IST

प्रत्येक नागरिकाला दिवसाला १३० ते १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते व तेवढे पाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौथ्या वित्त

जे.पी.डांगे : चौथ्या वित्त आयोगाची बैठकनागपूर: प्रत्येक नागरिकाला दिवसाला १३० ते १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते व तेवढे पाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी येथे केले.डांगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी नगर पालिका व नगर पंचायतींना आवश्यक असलेल्या निधीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी व सुविधांवर होणारा खर्च व त्यांना मिळणारे उत्पन्न, शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज याचा ताळमेळ घालून स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनुदानाची मागणी शासनाकडे करावी,अशी सूचनाही त्यांनी केली. सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज, शिक्षण तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन आदीसाठी होणाऱ्या खर्चाचाही शासकीय अनुदानात समावेश आहे.कर्मचारी नियमित करणे, कराचे उत्पन्न वाढविणे, अनुदान एकरकमी देणे, शाळांची कामे प्राधान्याने करणे, विविध खटल्यांसाठी वकिलांची नियुक्ती करणे, आदी सूचना डांगे यांनी यावेळी केल्या.बैठकीला रामटेक, कामठी, रामटेक, काटोल, नरखेड,मोवाड, कळमेश्वर, सावनेर, खापा आणि मोहपा नगरपालिका तसेच महादुला आणि मौदा नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)