शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

प्रत्येकाला किमान गरजेइतके पाणी द्या!

By admin | Updated: November 26, 2014 01:06 IST

प्रत्येक नागरिकाला दिवसाला १३० ते १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते व तेवढे पाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौथ्या वित्त

जे.पी.डांगे : चौथ्या वित्त आयोगाची बैठकनागपूर: प्रत्येक नागरिकाला दिवसाला १३० ते १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते व तेवढे पाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी येथे केले.डांगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी नगर पालिका व नगर पंचायतींना आवश्यक असलेल्या निधीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी व सुविधांवर होणारा खर्च व त्यांना मिळणारे उत्पन्न, शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज याचा ताळमेळ घालून स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनुदानाची मागणी शासनाकडे करावी,अशी सूचनाही त्यांनी केली. सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज, शिक्षण तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन आदीसाठी होणाऱ्या खर्चाचाही शासकीय अनुदानात समावेश आहे.कर्मचारी नियमित करणे, कराचे उत्पन्न वाढविणे, अनुदान एकरकमी देणे, शाळांची कामे प्राधान्याने करणे, विविध खटल्यांसाठी वकिलांची नियुक्ती करणे, आदी सूचना डांगे यांनी यावेळी केल्या.बैठकीला रामटेक, कामठी, रामटेक, काटोल, नरखेड,मोवाड, कळमेश्वर, सावनेर, खापा आणि मोहपा नगरपालिका तसेच महादुला आणि मौदा नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)