शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:05 IST

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देनाथजोगी समाजाचा हल्लाबोल मोर्चा : हातात काळे झेंडे घेऊन शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यशवंत स्टेडियम येथून नाथजोगी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा विधानभवनाकडे जात असताना मॉरिस टी पॉईंट येथे पोलिसांनी हा मोर्चा अडविला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चात सहभागी हजारो नाथजोगी बांधवांनी जोरदार नारेबाजी करीत आपल्या मागण्या रेटून धरल्या. ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे,’, ‘समाजाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘भटक्याला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला. धुळे हत्याकांड निषेध असे लिहिलेले काळे झेंडे हातात घेऊन नाथजोगी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. समाजातील नागरिकांना भटकंतीमुळे १९६१ चा वास्तव्याचा पुरावा मिळत नसल्यामुळे जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळत नाहीत. समाजाकडे स्थायी स्वरुपाचा उद्योग, पक्की घरे, शेती नसून भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या हितासाठी शासनाने कॅम्पद्वारे जातीचे दाखले देण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी मोर्चाला भेट देऊन आपले समर्थन दिले. मोर्चातील अनिल रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर यांच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मोर्चास्थळी भेट देऊन नाथजोगी समाजाच्या मागण्यांवर कारवाईचे करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व अनिल रमेश शिंदे,  प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर आदींनी केले.हत्याकांडातील मृतांच्या पीडित कुटबियांना २० लाखाची मदत त्वरित मिळाली पाहिजे, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी व कुटुंबाचे पुर्नवसन झाले पाहिजे, राईनपाडा ग्रामपंचायत इमारतीच्या ठिकाणी हत्याकांडातील मृतांचे स्मारक उभारावे, नागपूरच्या कळमना येथील बांधवांना जलदगती न्यायालयाद्वारे न्याय देऊन त्यांचे पुर्नवसन करावे, जात दाखल्यासाठी १९६१ च्या वास्तव्याच्या पुराव्याची जाचक अट रद्द करावी, नाथजोगी समाजाला फिरस्तीचे प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा