शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:05 IST

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देनाथजोगी समाजाचा हल्लाबोल मोर्चा : हातात काळे झेंडे घेऊन शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यशवंत स्टेडियम येथून नाथजोगी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा विधानभवनाकडे जात असताना मॉरिस टी पॉईंट येथे पोलिसांनी हा मोर्चा अडविला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चात सहभागी हजारो नाथजोगी बांधवांनी जोरदार नारेबाजी करीत आपल्या मागण्या रेटून धरल्या. ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे,’, ‘समाजाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘भटक्याला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला. धुळे हत्याकांड निषेध असे लिहिलेले काळे झेंडे हातात घेऊन नाथजोगी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. समाजातील नागरिकांना भटकंतीमुळे १९६१ चा वास्तव्याचा पुरावा मिळत नसल्यामुळे जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळत नाहीत. समाजाकडे स्थायी स्वरुपाचा उद्योग, पक्की घरे, शेती नसून भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या हितासाठी शासनाने कॅम्पद्वारे जातीचे दाखले देण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी मोर्चाला भेट देऊन आपले समर्थन दिले. मोर्चातील अनिल रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर यांच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मोर्चास्थळी भेट देऊन नाथजोगी समाजाच्या मागण्यांवर कारवाईचे करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व अनिल रमेश शिंदे,  प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर आदींनी केले.हत्याकांडातील मृतांच्या पीडित कुटबियांना २० लाखाची मदत त्वरित मिळाली पाहिजे, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी व कुटुंबाचे पुर्नवसन झाले पाहिजे, राईनपाडा ग्रामपंचायत इमारतीच्या ठिकाणी हत्याकांडातील मृतांचे स्मारक उभारावे, नागपूरच्या कळमना येथील बांधवांना जलदगती न्यायालयाद्वारे न्याय देऊन त्यांचे पुर्नवसन करावे, जात दाखल्यासाठी १९६१ च्या वास्तव्याच्या पुराव्याची जाचक अट रद्द करावी, नाथजोगी समाजाला फिरस्तीचे प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा