शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खातेधारकाला ३.५ लाख द्या; नागपूरच्या बँक आॅफ इंडियाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 10:55 IST

संगणकीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांनी बँक आॅफ इंडियाला दणका दिला आहे.

ठळक मुद्देआयटी कायद्यांतर्गत आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संगणकीय सुरक्षाविषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांनी बँक आॅफ इंडियाला दणका दिला आहे. बँकेच्या चुकीमुळे आर्थिक नुकसान झालेल्या खातेधारकाला ३ लाख ५० हजार रुपये देण्यात यावे असा आदेश देण्यात आला आहे.निर्मलकुमार आठवले असे ग्राहकाचे नाव आहे. ३ लाख ५० हजार रुपयांत आठवले यांच्या स्वत:च्या २ लाख ५० हजार रुपयांचा समावेश आहे. त्यांना तक्रारीच्या खर्चापोटी ८० हजार तर, मानसिक त्रासाकरिता २० हजार रुपये देण्यात आले आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, १७ जानेवारी २०१५ रोजी आठवले यांनी स्वत:च्या व पत्नीच्या नावाने बँक आॅफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेत संयुक्त बचत खाते उघडले होते. बँकेने त्या खात्यावर न मागता इंटरनेट बँकिंग सुविधा दिली होती. त्यापूर्वी त्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी कामठी शाखेत वैयक्तिक बचत खाते सुरू केले होते. ते खाते त्यांनी २१ एप्रिल २०१५ रोजी बंद केले होते. त्या खात्यावर आठवले यांच्या विनंतीवरून इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर २७ जून २०१५ रोजी आठवले यांना त्यांच्या वैशालीनगर शाखेतील संयुक्त बचत खात्यातून ३ लाख १०० रुपये कपात झाल्याचा मॅसेज आला. त्यामुळे त्यांनी २९ जून २०१५ रोजी बँकेत तक्रार दिली व ४ जुलै २०१५ रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला. दरम्यान, बँकेने १ जुलै रोजी आठवले यांच्या खात्यात ५० हजार १०० रुपये जमा केले.परंतु, उर्वरित दोन लाख ५० हजार रुपये त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. आठवले यांच्यातर्फे अ‍ॅड. महेंद्र लिमये व राजेश टेकाळे तर, बँकेतर्फे अ‍ॅड. उमेश देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडिया