शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना समाज कल्याणचे बळ

By admin | Updated: February 4, 2016 02:56 IST

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे.

मुलींच्या ४५० क्षमतेच्या वसतिगृहांना मंजुरी : नव्या सत्रात प्रवेश मिळतीलनागपूर : एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव प्रत्येकाला झाली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मुली शहरात धाव घेताहेत. वसतिगृहाच्या अपुऱ्या क्षमतेमुळे शेकडो मुलींना दरवर्षी वेटिंगमध्ये राहावे लागत होते. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुलींची हेळसांड थांबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने राज्य सरकारने मुलींसाठी विभागीयस्तरावरील ७, जिल्हा व तालुकास्तरावर ४३ वसतिगृहांना मान्यता दिली आहे. यात नागपूरला २५० क्षमतेचे विभागीय आणि जिल्हा व तालुकास्तरीय १०० क्षमतेचे दोन वसतिगृह मिळाले आहे. त्यामुळे नागपुरात मुलींच्या वसतिगृहाची क्षमता एक हजाराच्या जवळपास झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थिनीला हक्काचा निवारा मिळणार आहे. उत्तरोत्तर होणारा शिक्षणाचा प्रसार व शिक्षणाची जागृती लक्षात घेता मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची शहराकडे धाव असते. पुणे, मुंबईला ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांचे नागपूरकडे आकर्षण वाढले आहे. नागपूर विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याबरोबरच संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी नागपुरात येत आहेत. विद्यार्थिनींचीही संख्या यात मोठी आहे. शहरात समाज कल्याणच्या मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी चार वसतिगृह आहेत. त्याची क्षमता ५३० विद्यार्थ्यांची आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थिनींना वेटिंगमध्ये राहावे लागत होते. आता समाज कल्याण विभागाने तीन वसतिगृहांना मंजुरी दिल्याने जवळपास १००० विद्यार्थिनींच्या निवाऱ्याची चिंता मिटली आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहाबरोबरच काम करणाऱ्या महिलांसाठी समाज कल्याणच्या १०० क्षमतेच्या वसतिगृहालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोकरीसाठी येणाऱ्या महिलांनाही निवारा मिळणार आहे. (प्रतिनिधी)