शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:58 IST

आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी  आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

ठळक मुद्देपोरी जरा जपूनचा २०० वा प्रयोग उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी  आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम व्हावे, असे आवाहन महापौरनंदा जिचकार यांनी केले.महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विशेष समितीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गुरुवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री विजया मारोतकर यांच्या ‘पोरी जरा जपून’ या काव्यमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या २०० व्या प्रयोगाचे विद्यार्थिनीसाठी आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या.कार्यक्रमाला कवयित्री विजया मारोतकर,महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, झोन सभापती रूपाली ठाकूर, रिता मुळे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, स्वाती आखतकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, डॉ. मीनाल मोकदम, सरिता मते, विजया ब्राह्मणकर, डॉ. पूजा धांडे, विजया भुसारी, मंजू कारेमोरे, अश्विनी बावनकर आदी उपस्थित होते.प्रारंभी महापौर व सर्व मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. महापौरांच्या हस्ते कवयित्री विजया मारोतकर यांचा सत्कार करण्यात आला. पोरी जरा जपून या सत्यकथन पुस्तकाचे नंदा जिचकार व मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. २५ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून यानिमित्त १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुले व मुलींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.विजया मारोतकर यांनी उपस्थित शालेय व महाविद्यालयीन मुलींना बदलत्या काळात आधुनिकतेची शाल पांघरताना घ्यावयाची काळजी व संभाव्य धोक्याबाबत सूचक इशारा दिला. आधी आजी-आजोबा घरी मुलांचा सांभाळ करायचे, त्यांना संस्काराचे धडे द्यायचे. आज त्यांना घराची दारे बंद झाल्याने मुले पाळणाघर, शेजारी, कामवाली अशा ठिकाणी सांभाळली जातात. मात्र अशा ठिकाणांमधूनच ८० टक्के मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :MayorमहापौरNanda Jichakarनंदा जिचकार