शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी शाळा-मैदानात RSS वर बंदी घाला! खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस म्हणाले, "अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
4
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
5
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
6
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
7
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
8
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
9
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
10
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
11
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
12
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
13
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
14
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
15
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
16
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
17
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
18
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
19
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
20
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 23:22 IST

शिकवणी वर्गाला बाहेर पडण्याच्या बहाण्याने त्या थेट नागपुरात आल्या.

नरेश डोंगरे 

नागपूर -  स्वप्न दाखविले, कोणती फूस लावली, कळायला मार्ग नाही. त्या दोघी कुटुंबियांना अंधारात ठेवून भंडारा जिल्ह्यातून नागपुरात पोहचल्या. येथून सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये बसून थेट मुंबईकडे निघाल्या. मात्र, गाव, घरच्या मंडळींचे अंतर जस-जसे वाढत होते, तसतशी त्यांची अस्वस्थताही वाढत होती. या स्थितीत नागपूर-भुसावळ दरम्यान एका टीसीची (तिकिट तपासणीस) त्यांच्यावर नजर गेली अन् नंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे त्या दोघींचे भवितव्य सुरक्षित झाले.

सोना आणि मोना (नाव काल्पनिक) भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. नववीत शिकणाऱ्या या दोघींचे वय अनुक्रमे १३ आणि १४ वर्षे आहे. बुधवारी शिकवणी वर्गाला बाहेर पडण्याच्या बहाण्याने त्या थेट नागपुरात आल्या. येथे ट्रेन नंबर १२१४० सेवाग्राम एक्सप्रेस पकडून त्या मुंबईकडे निघाल्या. प्रारंभी त्या आश्वस्त होत्या. मात्र, आपल्या गावाचे, घरच्यांचे अंतर जस-जसे वाढू लागले, तसतशी त्यांची अस्वस्थताही वाढली. गाडी सुसाट वेगाने धावत होती. अशात एस-५ कोचमध्ये रोहित शुक्ला नामक टीसीने या दोघींकडे तिकिट मागितले. त्यांच्याकडे तिकिट नव्हतीच. त्यामुळे आधीच भेदरलेल्या या दोघी जास्तच घाबरल्या. त्या दोघी विनातिकिट प्रवास करीत आहे आणि कुटुंबातील किंवा ओळखीचा कोणताही व्यक्ती त्यांच्यासोबत नसल्याचे लक्षात येताच रोहित यांनी त्यांचे सहकारी विजय वर्मा आणि अंशूल जैन यांना ही बाब सांगितली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन या तिघांनी वाणिज्य नियंत्रकांच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) ही माहिती कळविली. त्यांनी लगेच या दोघींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली.

पालकांचा जीव भांड्यातप्राथमिक चाैकशीत या दोघींनी सांगितलेले घर सोडण्याचे कारण ऐकून आरपीएफ तसेच चाईल्ड लाईनच्या सदस्यांनाही धक्का बसला. त्यानंतर या दोघींचे समुपदेशन करून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला. तिकडे मुली गायब झाल्याचे लक्षात आल्यापासून दोघींचेही पालक अस्वस्थ होते. या दोघी सोबत आणि सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या जिवात जीव आला.

एकट्या मुलींना हेरून त्यांना वेगवेगळे आमिष दाखवायचे किंवा फूस लावून त्यांचे अपहरण करायचे आणि नंतर त्यांचे लैंगिक शोषण करायचे, असे प्रकार सर्वत्र नेहमी होत असल्याचे दिसून येते. या प्रकरणातील दोघींचे वय आणि त्यांची एकूणच स्थिती बघता त्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. मात्र, तिकिट तपासणीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे त्या दोघी सुखरूप कुटुंबियात पोहचण्याचा मार्ग सुकर झाला. 

टॅग्स :railwayरेल्वे