शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘आयआयएम-नागपूर’मध्ये विद्यार्थिनींचा टक्का घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:27 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे.

ठळक मुद्देमागील ‘बॅच’च्या तुलनेत ६ टक्क्यांची घट‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची संख्या वाढीस

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे. यंदा ६ टक्क्यांची घट दिसून आली आहे. मागील ‘बॅच’मध्ये प्रथमच विद्यार्थिनींची संख्या २० टक्क्यांहून अधिक गेली होती. दुसरीकडे यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्रेशर्स’ची संख्या काही प्रमाणात वाढलेली आहे.‘आयआयएम-नागपूर’ स्थापन झाल्यानंतर पहिले तीन वर्षे विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. २०१८-२० च्या या चौथ्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींची संख्या २२ टक्के इतकी गेली होती. परंतु या वर्षी ‘आयआयएम-नागपूर’मध्ये १२३ प्रवेश असून यातील विद्यार्थिनींची संख्या ही जवळपास १६ टक्के इतकीच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची घट झाली आहे.‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.‘आयआयएम-नागपूर’मध्ये मागील वर्षीपासून याबाबत पुढाकार घेण्यात आला. मात्र ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा २९ महिन्यांचा सरासरी अनुभव‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी १३ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांची वाढ झाली आहे. ५९ टक्के विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. तर २८ टक्के विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक कामाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा २९ महिने इतका आहे. तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र