शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गिरीश गांधींनी घडवून आणला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार : मुत्तेमवार-ठाकरे गटाची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 08:30 IST

Nagpur News प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील, तर एकसंघ रहा, असा सल्ला मान्यवरांकडून देण्यात आला.

ठळक मुद्देएकसंघ राहण्याचा गांधी-चतुर्वेदींचा काँग्रेसजनांना सल्ला

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. या सोहळ्यात काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील, महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवायचा असेल तर एकसंघ रहा, असा सल्ला मान्यवरांकडून देण्यात आला. मात्र, दुसरीकडे याच सत्कार सोहळ्याला मुत्तेमवार-ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पहायला मिळाले. (Girish Gandhi felicitates Congress office bearers)

शंकरनगर चौकातून राष्ट्रभाषा संकुलात आयोजित छोटेखानी सोहळ्यात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, रामकिशन ओझा, नरू जिचकार, संदेश सिंगलकर, कमलेश समर्थ, तक्षशिला वाघधरे, नंदा पराते, रवींद्र दरेकर, हैदरअली दोसानी आदींचा सत्कार करण्यात आला. मात्र, मुत्तेमवार-ठाकरे गटाचे उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रा. विजय बारसे यांनी मात्र वेगवेगळी कारणे देत दांडी मारली. या सर्वांची अनुपस्थिती उपस्थितांनाही खटकली. त्यामुळे भविष्यातही गटबाजी थांबेल याबाबतच शंकाच आहे. प्रास्ताविक अतुल कोटेचा यांनी केले. श्रीराम काळे यांनी आभार मानले.

ईडी, सीबीआयने त्रास दिला तरी काही बिघडत नाही : चतुर्वेदी

- काँग्रेसला भाजपच्या विचारधारेसोबत लढतानाच त्यांचे नेटवर्क व आर्थिक ताकदीशीही लढावे लागेल. आपले लक्ष्य भाजप असायला हवे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार नव्हे. ईडी, सीबीआयने कितीही त्रास दिला तरी काही बिघडत नाही. जो तुरुंगात गेला तो हिरो बनला, असा इतिहास आहे. लोकांना दमन आवडत नाही. त्यामुळे चिंता न करता काँग्रेस बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी केले. काँग्रेसने आपल्याला खूप काही दिले. आता निवडणूक लढायची नाही. काही मागायचे नाही. पक्षाचे कर्ज फेडायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी-फडणवीस हे उत्तर-दक्षिण ध्रुव : गांधी

- भाजप नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध उत्तर व दक्षिण धुव्रासारखे आहेत. हे काही आता लपून नाही. मात्र, पक्षाच्या बैठकीत ते एकत्र असतात. एकत्रित निर्णय घेतात, असे सांगून गिरीश गांधी यांनी गडकरी-फडणवीसांमधील वाढत्या दरीवर बोट ठेवले. सोबतच पक्षासाठी त्यांच्या एकीचे उदाहरण देत काँग्रेस कार्यकर्त्यांनीही काही बाबी न पटल्यास प्रसार माध्यमांकडे धाव घेण्याऐवजी पक्षाकडे मत नोंदवावे, असा सल्ला दिला. महापालिकेच्या निवडणुकीत गटतट, वाद बाजूला सारा. आपल्या माणसाला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाचा उमेदवार पाडू नका, उलट वॉर्डनिहाय जबाबदारी स्कीकारा, असा सल्लाही गांधी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला.

गटबाजी सोडून काम करा- घारड

- प्रदेश काँग्रेसवर अनेकांना संधी मिळाली. अनेक कर्मठ कार्यकर्त्यांची नावे राहून गेली. मात्र, पद असो वा नसो पक्षाचे काम करा. काँग्रेसमध्ये नागपूर शहराला एक वेगळे महत्त्व आहे. गटबाजी बाजूला सारून एकत्र या व महापालिका जिंका, असे आवाहन ज्येष्ठ नेते अनंतराव घारड यांनी केले.

आधी नेत्यांनी एकत्र बसावे : ओझा

नागपुरात नेत्यांच्या भांडणात काँग्रेसच्या पुढील तीन पिढ्या भुईसपाट झाल्या आहेत. नेते एकत्र बसल्याशिवाय महापालिकेची निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे कुणाचे पाय पकडायचे असतील तर सांगा, आम्ही तेही करू पण आधी नेत्यांनी आपली भूमिका बदलावी, अशी रोखठोक भूमिका रामकिशन ओझा यांनी मांडली.

टॅग्स :congressकाँग्रेस