शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

इस्पितळांच्या नफेखोरीला चाप लावणार : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:10 IST

हृदयशस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेन्ट्स’च्या किमती जरी कमी झाल्या असल्या तरी इतर शुल्कांचे नाव देऊन काही इस्पितळांकडून रुग्णांची लुबाडणूकच सुरू असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र या नफेखोरीला राज्य शासनाकडून चाप बसविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपेट्रोलपंप चालकांना ‘आॅडिट’ अहवाल अनिवार्य‘लोकमत’ला सदिच्छा भेट

आॅनलाईन लोकमतनागपूर : हृदयशस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेन्ट्स’च्या किमती जरी कमी झाल्या असल्या तरी इतर शुल्कांचे नाव देऊन काही इस्पितळांकडून रुग्णांची लुबाडणूकच सुरू असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र या नफेखोरीला राज्य शासनाकडून चाप बसविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे निर्देशदेखील देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. बापट यांनी मंगळवारी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागासोबत विविध विषयांवर संवाद साधला.इस्पितळांची नफेखोरी बंद व्हावी व सामान्य रुग्णांवर शुल्काचे ओझे पडू नये यासाठी केंद्राकडून ‘स्टेन्ट’प्रमाणे १८ इतर वैद्यकीय उपकरणांचे दर निश्चित करण्यासाठी विचार सुरू आहे. तरीदेखील नफेखोरीसाठी इतर शुल्कांचा मार्ग वापरणाऱ्या  इस्पितळांकडे शासनाचे लक्ष आहे. औषधांच्या किमतीवरदेखील अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आता आम्ही यासंदर्भात सर्व प्रक्रिया आॅनलाईन पोर्टलवर आणण्याचा विचार करत आहोत. औषध दुकानांचे व्यवहार येथे नोंदवावे लागतील व सोबतच वैद्यकीयतज्ज्ञांचे ‘प्रिस्क्रिप्शन’देखील जोडावे लागेल. त्यामुळे गैरव्यवहार कमी होतील, असा दावा बापट यांनी केला. काही पेट्रोलपंपावरदेखील ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही पेट्रोलपंप धारकांना ‘आॅडिट’ अनिवार्य केले आहे. कंपनीच्या प्रतिनिधींवरदेखील जबाबदारी निश्चित केली असल्यामुळे उपकरणांत कुठलाही बदल करणे त्यांना शक्य होणार नाही. ही प्रणाली फक्त महाराष्ट्रातच लागू करण्यात आली आहे, अशी माहिती बापट यांनी दिली. ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी बापट यांचे स्वागत केले.सभागृहात मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावीगेल्या काही काळापासून राजकीय प्रणालीतदेखील बदल झाले आहेत. आमदार हे आता आत्मकेंद्रित झाले असून स्वत:च्या मतदारसंघापुरताच विचार करताना दिसून येतात. सभागृहात अनेकदा तर विधेयकांवर सखोल चर्चाच होत नाही. जर मूळ प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली तर अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल, असे गिरीश बापट यांनी सांगितले.विदर्भाशी माझी नाळ जुळलेलीयावेळी बापट यांनी विदर्भाशी असलेल्या संबंधांबाबतदेखील माहिती दिली. आम्ही अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या गावचे असून माझ्या वडिलांचे शिक्षण वगैरे तेथेच झाले. आजदेखील तेथे आमचे नातेवाईक राहतात. विदर्भाबाबत माझ्या मनात विशेष जिव्हाळा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :ministerमंत्री