शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

उमरेड : वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना दरवर्षी कमालीचे नुकसान सोसावे लागत ...

उमरेड : वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना दरवर्षी कमालीचे नुकसान सोसावे लागत आहे. याच आम नदीच्या पात्रात ठोंबरा रस्त्यालगत पुरातन काळातील कोल्हापुरी बंधारा अजूनही कसाबसा शाबूत आहे. चार-पाच वर्षांपूर्वी चोरट्यांनी बंधाऱ्याचे लोखंडी गेट पळविले. चोरट्यांनी हातसफाई केल्यानंतरही जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाला जाग आली नाही. या बंधाऱ्याची अद्याप दुरुस्तीही झाली नाही. एकीकडे आम नदीच्या प्रवाहाला बाधा उत्पन्न करण्याचे काम वेकोलिने केले. त्यानंतर बंधाऱ्याचे गेटच चोरीला गेले. यामुळे वेकोलिने दिलेल्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम लघु सिंचन विभागाने केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

१९७०-७२ च्या काळात ठोंबरा मार्गालगतचा कोल्हापुरी बंधारा जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. १२ ते १५ लोखंडी गेट या बंधाऱ्याला होते. यामुळे आम नदीच्या किनारी असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा लाभ होत असे. त्यानंतर कोळसा खाणीतून निघालेला गाळ, तेलमिश्रित रसायन आणि काटेरी झाडेझुडपांमुळे आम नदीचा प्रवाह थांबला. अशातच बंधाऱ्याचे लोखंडी गेटच चोरट्यांनी लांबविले. या परिसरातसुद्धा केरकचरा आणि बंधाऱ्याला झुडपांचा वेढा दिसून आला. मागील अनेक वर्षांपासूनची ही समस्या लघु सिंचन विभागाने सोडविली नाही. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे. अशावेळी वेकोलिने तातडीने दखल घेऊन आम नदीपात्राचे खोलीकरण करावे. शिवाय ठोंबरा रस्त्यानजीक असलेला कोल्हापुरी बंधारा नव्याने उभारण्यात यावा, अशी मागणी धीरज गिरडकर, दामोदर बानकर, सोपान गिरडकर, राघोजी गिरडकर, मनोज गिरडकर, ज्ञानेश्वर गिरडकर आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.

अंदाजपत्रक पाठविले

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या अवस्थेबाबत जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे शाखा अभियंता विष्णू लांडे यांच्याशी चर्चा केली असता, सदर बंधाऱ्याबाबतचे अंदाजपत्रक नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ३० लाख ४२ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकाला तातडीने मान्यता प्रदान करावी. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सदर कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

--