शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गतवैभवाकडे मोवाडची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:55 IST

एकेकाळी जिल्ह्यातील समृद्ध नगर परिषद म्हणून गाजावाजा असलेले मोवाड हे वर्धा नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाले.

ठळक मुद्देमोवाड महापुराला २६ वर्षे : २०४ गावकºयांना मिळाली होती जलसमाधी

श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : एकेकाळी जिल्ह्यातील समृद्ध नगर परिषद म्हणून गाजावाजा असलेले मोवाड हे वर्धा नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाले. ३० जुलै १९९१ ची ती ‘काळ रात्र’ ठरली आणि २०४ ग्रामस्थांना जलसमाधी मिळाली. त्या दुर्घटनेमुळे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले मोवाड आता २६ वर्षांनंतर कात टाकू लागले आहे. तेथील जीवनमान पूर्वपदावर येत असून विकासकामांना आता चालना मिळू लागली आहे. यामुळे आता मोवाडची गतवैभवाकडे वाटचाल सुरू झाली आहे.महापुरानंतर मोवाडचे पुनर्वसन करण्यात आले. ६.६५ चौरस किमी क्षेत्रात वसलेल्या पुनर्वसित मोवाड गावाची लोकसंख्या सध्याच्या घडीला ८७७७ आहे. गावात २२ किमी लांबीचे रस्ते आहे. एक महाविद्यालय, दोन हायस्कूल, चार प्राथमिक शाळा आहे. शासकीय रुग्णालय, बँका यासह इतर कार्यालये नागरिकांच्या सेवेत आहे. गावात ५ कोटी ३६ लाख रुपये खर्चातून रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. शहराप्रमाणे रस्त्यांना सोलर पॅटर्न स्टड लावल्यामुळे गावाच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. २ कोटी ४० लाख रुपये खर्चातून १०५ दुकान गाळ्याची कामे सुरू आहेत. याचा फायदा येथील बेरोजगार तरुणांना होणार आहे. २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून बाजारात ओट्यांची निर्मिती केली जात आहे.वैशिष्ट्यपूर्ण कामे आणि दलित वस्तीअंतर्गत गावातील सहा उद्यानांमध्ये प्ले स्टेशन, ग्रीन जिम, खेळणी, योग केंद्र आदींची सुविधा करण्यात येत आहे. चार कोटींच्या निधीतून मिनी स्टेडियम तसेच वॉर्ड क्र. ३ मध्ये जिम, बॅडमिंटन कोर्ट, वेटलिफ्टिंग, कबड्डी मैदान, हॅन्डबॉल कोट, रनिंग ट्रॅक येथे साकार होणार आहे. गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ४४ किमी लांबीच्या नाल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई येथील आयआयटीकडून शहर स्वच्छता आराखड्यांतर्गत सांडपाणी तंत्रज्ञान घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.कर्जमाफ, हस्तांतरणाची अट रद्दमहापुरानंतर नवीन ठिकाणी पुनर्वसन करताना शासनाने मोवाड येथील नागरिकांना कर्जपुरवठा केला. तसेच अहस्तांतरणीय जमिनीचे पट्टे वाटप केले. परंतु पुनर्वसनस्थळी रोजगाराच्या फारशा संधी नसल्याने नागरिकांना कर्जाची परतफेड करण्यात प्रचंड अडचणी गेल्या. मोवाडचे नागरिक महापुराच्या धक्क्यातून सावरत असताना कर्जामुळे पुन्हा ते अस्वस्थ झाले. यासाठी तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर अख्ख्या मोवाडवरील कर्ज माफ झाले.