शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गतवैभवाकडे मोवाडची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:55 IST

एकेकाळी जिल्ह्यातील समृद्ध नगर परिषद म्हणून गाजावाजा असलेले मोवाड हे वर्धा नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाले.

ठळक मुद्देमोवाड महापुराला २६ वर्षे : २०४ गावकºयांना मिळाली होती जलसमाधी

श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : एकेकाळी जिल्ह्यातील समृद्ध नगर परिषद म्हणून गाजावाजा असलेले मोवाड हे वर्धा नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाले. ३० जुलै १९९१ ची ती ‘काळ रात्र’ ठरली आणि २०४ ग्रामस्थांना जलसमाधी मिळाली. त्या दुर्घटनेमुळे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले मोवाड आता २६ वर्षांनंतर कात टाकू लागले आहे. तेथील जीवनमान पूर्वपदावर येत असून विकासकामांना आता चालना मिळू लागली आहे. यामुळे आता मोवाडची गतवैभवाकडे वाटचाल सुरू झाली आहे.महापुरानंतर मोवाडचे पुनर्वसन करण्यात आले. ६.६५ चौरस किमी क्षेत्रात वसलेल्या पुनर्वसित मोवाड गावाची लोकसंख्या सध्याच्या घडीला ८७७७ आहे. गावात २२ किमी लांबीचे रस्ते आहे. एक महाविद्यालय, दोन हायस्कूल, चार प्राथमिक शाळा आहे. शासकीय रुग्णालय, बँका यासह इतर कार्यालये नागरिकांच्या सेवेत आहे. गावात ५ कोटी ३६ लाख रुपये खर्चातून रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. शहराप्रमाणे रस्त्यांना सोलर पॅटर्न स्टड लावल्यामुळे गावाच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. २ कोटी ४० लाख रुपये खर्चातून १०५ दुकान गाळ्याची कामे सुरू आहेत. याचा फायदा येथील बेरोजगार तरुणांना होणार आहे. २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून बाजारात ओट्यांची निर्मिती केली जात आहे.वैशिष्ट्यपूर्ण कामे आणि दलित वस्तीअंतर्गत गावातील सहा उद्यानांमध्ये प्ले स्टेशन, ग्रीन जिम, खेळणी, योग केंद्र आदींची सुविधा करण्यात येत आहे. चार कोटींच्या निधीतून मिनी स्टेडियम तसेच वॉर्ड क्र. ३ मध्ये जिम, बॅडमिंटन कोर्ट, वेटलिफ्टिंग, कबड्डी मैदान, हॅन्डबॉल कोट, रनिंग ट्रॅक येथे साकार होणार आहे. गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ४४ किमी लांबीच्या नाल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई येथील आयआयटीकडून शहर स्वच्छता आराखड्यांतर्गत सांडपाणी तंत्रज्ञान घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.कर्जमाफ, हस्तांतरणाची अट रद्दमहापुरानंतर नवीन ठिकाणी पुनर्वसन करताना शासनाने मोवाड येथील नागरिकांना कर्जपुरवठा केला. तसेच अहस्तांतरणीय जमिनीचे पट्टे वाटप केले. परंतु पुनर्वसनस्थळी रोजगाराच्या फारशा संधी नसल्याने नागरिकांना कर्जाची परतफेड करण्यात प्रचंड अडचणी गेल्या. मोवाडचे नागरिक महापुराच्या धक्क्यातून सावरत असताना कर्जामुळे पुन्हा ते अस्वस्थ झाले. यासाठी तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर अख्ख्या मोवाडवरील कर्ज माफ झाले.