शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मुनगंटीवार समिती करणार गंगाकाठ हिरवागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:26 IST

गंगानदीचा काठ आता अधिक हिरवागार व वनसंपन्न होणार आहे. केंद्र सरकारने गंगा नदीच्या काठावर तब्बल १० कोटी झाडे लावण्याची योजना आखली आहे.

ठळक मुद्दे१० कोटी झाडे लावणार : पाच राज्यांचे मंत्री सदस्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगानदीचा काठ आता अधिक हिरवागार व वनसंपन्न होणार आहे. केंद्र सरकारने गंगा नदीच्या काठावर तब्बल १० कोटी झाडे लावण्याची योजना आखली आहे. यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार व पश्चिम बंगालचे मंत्री या समितीचे सदस्य असतील.केंद्र सरकारने झुडपी जंगल व चराईच्या जागा यांना वन जमिनीऐवजी चराईची जागा म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे आता लाखो हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. या जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले तर पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल, अशी संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत गडकरी यांनी गंगाकाठी वृक्षलागवड करण्याची योजना आखली आहे. यासाठी राष्ट्रीय पातळीवर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून काही राज्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला होता. त्यासाठी त्यांनी ग्रीन आर्मी तयार केली होती. १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. हे काम रेकॉर्ड करणारे ठरले होते. यामुळे गंगाकाठी १० कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुखपदी वनमंत्री मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे.१०० नर्सरी, वाराणसीत कार्यालयया प्रकल्पासाठी १०० अत्याधुनिक नर्सरी तयार केल्या जातील. या नर्सरीत तयार होणारी रोपे गंगा काठावर लावली जातील. त्याचे संगोपन केले जाईल. या प्रकल्पासाठी नेमलेल्या समितीचे कार्यालय वाराणसी येथे सुरू होणार आहे. त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.