शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

गाेंडखैरी काेळसा खाणीची जनसुनावणी वादळी ठरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 22:25 IST

Nagpur News नागपूर शहरापासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यात गाेंडखैरी येथील काेळसा खाणीचा पट्टा अदानी समुहाला देण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने गुरुवार १३ जुलै राेजी जनसुनावणी आयाेजित केली आहे.

नागपूर : नागपूर शहरापासून अवघ्या २० किलाेमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यात गाेंडखैरी येथील काेळसा खाणीचा पट्टा अदानी समुहाला देण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने गुरुवार १३ जुलै राेजी जनसुनावणी आयाेजित केली आहे. मात्र आधीच या पट्ट्यातील २४ ग्रामपंचायती, पर्यावरण कार्यकर्त्यांनी खाणीला विराेध दर्शविणारे पत्र एमपीसीबीला सादर केले आहे. त्यामुळे  जनसुनावणी वादळी ठरण्याची शक्यता आहे.

नागपूर शहराला लागूनच असलेल्या गोंडखैरी कोळसा खाणीचा पट्टा हा अदानी समूहाला देण्यात आला असून येथे भूमिगत कोळसा खाण सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. तशी प्रक्रिया देखील केंद्रानं सुरू केली आहे. गोंडखैरी, वडधामना या नव्याने विकसित होत असलेला निमशहरी भाग आहे. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीच्या नागपूर मेट्रो परिसरामधील २२ गावे या कोळसा खाणीने प्रत्यक्ष आणि आजूबाजूची ८३ गावे अप्रत्यक्षरीत्या बाधित हाेणार आहेत. त्यामुळे खाणीला पर्यावरणवाद्यांचा विराेध असताना ग्रामस्थांनीही प्रचंड विराेध नाेंदविला आहे.

काेळशा खाणीमुळे बाधित हाेणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायतींनी प्रस्तावित खाणीविराेधात ठराव पारीत करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला धाडले आहे. यामध्ये गाेंडखैरीसह खैरी (पन्नासे), धामना (लिंगा), द्रुगधामना, वडधामना, निलडाेह, नागलवाडी, साेनेगाव (निपानी), व्याहाड, पेठ (कालडाेंगरी), सुराबर्डी, सावली, सेलू, दहेगाव, सहजापूर, आलेसूर, पिपळा, सुरदवलामेटी, माराेतीनगर वाडी आदी गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्हा काॅंग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अदानीच्या काेळसा खाणीविराेधात पत्र सादर केले आहे. काही आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनीही विराेध दर्शविला आहे. सर्व गावकऱ्यांनी प्रस्तावित खाणीविराेधात तीव्र आंदाेलनाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत कळमेशृवर तालुक्यातील कारली गावाच्या तलावाजवळ सकाळी ११ वाजतापासून ही जनसुनावणी सुरू हाेणार असून गदाराेळ हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

८६२ हेक्टरचा पट्टा

कळमेश्वर तालुक्यात गाेंडखैरी येथे ८६२ हेक्टरमध्ये ही खाण प्रस्तावित आहे. अदानी पाॅवरने भूमिगत काेळसा खाण सुरू करण्याचा विचार केला आहे. या खाणीतून दरवर्षी ३ दशलक्ष मेट्रिक टन काेळशाचे उत्पादन हाेईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या खाणीमुळे हाेणारे जलवायू प्रदूषण, पाण्याचा वापर, गावांचे विस्थापन अशा अनेक गाेष्टी प्रभावित करणार असल्याने गावकऱ्यांनी तीव्र विराेध दर्शविला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण