शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गांधींच्या सच्च्या वचनात होते मंत्राचे सामर्थ्य : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:31 IST

ज्या वचनात सच्चेपणा असतो, त्यात मंत्राचे सामर्थ्य असते. महात्मा गांधी यांच्याबद्दल तरी हेच लागू पडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांंनी केले.

ठळक मुद्देशतकोत्तर जयंतीनिमित्त वि.सा. संघात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९१५ मध्ये देशाला माहीतही नसणारे आणि काँग्रेसच्या अधिवेशनात अगदी मागच्या रांगेत बसणारे महात्मा गांधी १९२० मध्ये या देशाचे नेते झाले. एका अनभिज्ञ माणसामागे देश उभा राहणे ही जगाला अचंबित करणारी बाब आहे. त्यांच्या वचनात सच्चाई होती. ज्या वचनात सच्चेपणा असतो, त्यात मंत्राचे सामर्थ्य असते. महात्मा गांधी यांच्याबद्दल तरी हेच लागू पडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांंनी केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या छायाचित्राचे अनावरण झाले. हे औचित्य साधून विदर्भ साहित्य संघाच्यावतीने ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ या विषयावर प्रा. द्वादशीवार यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाची आणि पैलूंची द्वादशीवार यांनी मांडणी केली. ते म्हणाले, गांधींच्या आयुष्याला अनेक वळणे होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी नेमका तोच आधार घेतला. खरे तर गांधी कुणालाच उमगले नाहीत. अगदी त्यांचे राजकीय अनुयायी असणाऱ्या नेहरूंना आणि वल्लभभाईंना देखील ते पूर्णपणे उमगू शकले नाही.गांधींबद्दलच्या अपसमजाला महाराष्ट्रातील विचावंतच कारणीभूत असल्याचे सांगून द्वादशीवार म्हणाले, मार्क्सवादी-समाजवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी आणि आंबेडकरवादी असा चार विचारवंतांचा वर्ग महाराष्ट्रात आहे. मार्क्सवाद्यांचा सर्वात मोठा वैचारिक पराभव गांधींनी केला. मार्क्सवाद्यांना देशात श्रमिकांचे राज्य आणायचे होते. तरीही ८० टक्के शेतकरी-मजूर असलेली जनता ‘महात्मा गांधी की जय’ असेच म्हणायची. हिंदुत्वावाद्यांनी गांधींवर अनेक आक्षेप घेतले. फाळणीसाठी त्यांना जबाबदार धरले जात असले तरी फाळणीचा विचार गांधींच्या उदयापूर्वीपासूनचा होता, हे लक्षात घ्यावे. आंबेडकरवाद्यांनी गांधीना नेहमीच दूर ठेवले तर देशाला गांधी समजावून सांगण्याची जबाबदारी खुद्द गांधीवाद्यांना पेलता आली नाही.गांधींच्या शब्दात सामर्थ्य होते. त्यांच्या आवाहनावरून लोकांनी शाळा, नोकऱ्या, वकिली सोडल्या. ‘करा वा मरा’ सांगितल्यावर माणसे मरायलाही तयार झाली. गांधी महात्मा होण्याला हेच कारण आहे. असे असले तरी एका मराठी माणसाने त्यांची हत्या केली हा महाराष्ट्रावर लागलेला कलंक आहे. तो पुसता आला नाही. आजही त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून उन्माद साजरा केला जातो. ही घटनाच त्यांचे अमरत्व सांगणारी बाब आहे. माणसांमधील नाते आहे, तो पर्यंत गांधी जिवंतच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार प्रकाश एदलाबादकर यांनी मानले. शहरातील अनेक नामवंत मंडळी यावेळी उपस्थित होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर