शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींची माकडं पोहोचली आरटीओ कार्यालयाच्या भिंतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 11:40 IST

आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनव्या तीन संदेशासोबत येणाऱ्यांसाठी आरसाही लावला

सय्यद मोबीन

नागपूर : दलालांच्या विळख्याने कालपर्यंत चर्चेत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या भिंतीवर महात्मा गांधींची संदेश देणारी तीन माकडं पोहोचली आहेत. एवढेच नव्हे तर या माकडांच्या प्रतिमांच्या शेजारीच एक आरसाही लावण्यात आला आहे. उत्तम नागरिक बना, असा संदेश देण्यासोबतच स्वत:लाही तपासण्यासाठी आरसा बघा, असा संदेशच या निमित्ताने हे कार्यालय देत आहे.

आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. परंतु, ऑनलाइन व्यवहारामुळे ही परिस्थिती बदलली आहे. दलालांचा वावर कमी करण्यासोबतच कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या जुन्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न हे कार्यालय करीत आहे. याच संकल्पनेतून शहर आरटीओ रवींद्र भुयार यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांनी नागरिकांना चांगले व्यक्ती होण्याचा संदेश देणारे पोस्टर कार्यालयात लावले आहेत. या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.

या उपक्रमासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ही माकडं त्यांच्या नियमित संदेशाऐवजी चांगला विचार करा, चांगले पहा व चांगले बोला असे तीन संदेश देत आहेत. लागूनच एक आरसा लावण्यात आला असून, त्याखाली ‘चांगला’ असे लिहिण्यात आले आहे. या आरशात पाहा आणि स्वत:ला तपासा, असा विचार यातून पेरला जात आहे. आरटीओ कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी प्रामाणिकपणे वागावे व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊ नये, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.

विचार चांगले तर सर्वच चांगले

चांगला विचार केला, चांगले पाहिले व चांगले बाेललो तर सर्वकाही चांगले होते. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला. सर्वांनी या उपक्रमातून प्रेरणा घेऊन स्वत:ला उत्तम नागरिक बनवणे अपेक्षित आहे.

- रवींद्र भुयार, आरटीओ (सिटी)

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSocialसामाजिक