शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 20:54 IST

Nagpur News नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधीरेंद्र झा यांचे प्रतिपादन, विनोबा विचार केंद्रात व्याख्यान

नागपूर : महात्मा गांधींना मारणे सोपे नव्हते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारत कसा असेल याविषयी चर्चा सुरू होती. नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.

अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘गांधीज एसासीन द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया’ या आपल्या पुस्तकावर धीरेंद्र झा यांनी भाष्य केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे होत्या. व्यासपीठावर श्याम पांढरीपांडे उपस्थित होते. धीरेंद्र झा म्हणाले, गोडसे आणि आरएसएसचे संबंध होते. परंतु हत्येच्या वेळी नथुराम गोडसे आरएसएसचा सदस्य नव्हता, असे चौकशीत मांडण्यात आले. गांधींच्या हत्येनंतर आरएसएसचे मुख्यालय सील करण्यात आले होते.

गांधीजी हे राष्ट्राचा आत्मा होते. त्यांना सर्वसमावेशक भारत हवा होता. गांधीनंतर हिंदुराष्ट्राच्या विचारातूनच दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. आरएसएस आणि हिंदू महासभेची जी विचारधारा होती तीच विचारधारा गोडसेची होती, असे झा यांनी सांगितले. ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे यांनी राज्यघटना हा खरा धर्मग्रंथ असून त्यावरच आघात करण्यात येत असल्याची खंत व्यक्त करून आज देशाला रामकथेची नव्हे तर गांधी कथेची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संचालन वंदन गडकरी यांनी केले. प्रास्ताविक श्याम पांढरीपांडे यांनी केले.

.............

टॅग्स :Socialसामाजिक