शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 20:54 IST

Nagpur News नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधीरेंद्र झा यांचे प्रतिपादन, विनोबा विचार केंद्रात व्याख्यान

नागपूर : महात्मा गांधींना मारणे सोपे नव्हते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारत कसा असेल याविषयी चर्चा सुरू होती. नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.

अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘गांधीज एसासीन द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया’ या आपल्या पुस्तकावर धीरेंद्र झा यांनी भाष्य केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे होत्या. व्यासपीठावर श्याम पांढरीपांडे उपस्थित होते. धीरेंद्र झा म्हणाले, गोडसे आणि आरएसएसचे संबंध होते. परंतु हत्येच्या वेळी नथुराम गोडसे आरएसएसचा सदस्य नव्हता, असे चौकशीत मांडण्यात आले. गांधींच्या हत्येनंतर आरएसएसचे मुख्यालय सील करण्यात आले होते.

गांधीजी हे राष्ट्राचा आत्मा होते. त्यांना सर्वसमावेशक भारत हवा होता. गांधीनंतर हिंदुराष्ट्राच्या विचारातूनच दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. आरएसएस आणि हिंदू महासभेची जी विचारधारा होती तीच विचारधारा गोडसेची होती, असे झा यांनी सांगितले. ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे यांनी राज्यघटना हा खरा धर्मग्रंथ असून त्यावरच आघात करण्यात येत असल्याची खंत व्यक्त करून आज देशाला रामकथेची नव्हे तर गांधी कथेची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संचालन वंदन गडकरी यांनी केले. प्रास्ताविक श्याम पांढरीपांडे यांनी केले.

.............

टॅग्स :Socialसामाजिक