शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या वादातून गांधींची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 20:54 IST

Nagpur News नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधीरेंद्र झा यांचे प्रतिपादन, विनोबा विचार केंद्रात व्याख्यान

नागपूर : महात्मा गांधींना मारणे सोपे नव्हते. परंतु स्वातंत्र्यानंतर भारत कसा असेल याविषयी चर्चा सुरू होती. नथुराम गोडसे आणि त्याच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहरू आणि गांधी हे हिंदुराष्ट्रासाठी अडथळा असल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी कट रचून महात्मा गांधींची हत्या केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांनी व्यक्त केले.

अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘गांधीज एसासीन द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया’ या आपल्या पुस्तकावर धीरेंद्र झा यांनी भाष्य केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे होत्या. व्यासपीठावर श्याम पांढरीपांडे उपस्थित होते. धीरेंद्र झा म्हणाले, गोडसे आणि आरएसएसचे संबंध होते. परंतु हत्येच्या वेळी नथुराम गोडसे आरएसएसचा सदस्य नव्हता, असे चौकशीत मांडण्यात आले. गांधींच्या हत्येनंतर आरएसएसचे मुख्यालय सील करण्यात आले होते.

गांधीजी हे राष्ट्राचा आत्मा होते. त्यांना सर्वसमावेशक भारत हवा होता. गांधीनंतर हिंदुराष्ट्राच्या विचारातूनच दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. आरएसएस आणि हिंदू महासभेची जी विचारधारा होती तीच विचारधारा गोडसेची होती, असे झा यांनी सांगितले. ज्येष्ठ गांधीवादी नेत्या लीलाताई चितळे यांनी राज्यघटना हा खरा धर्मग्रंथ असून त्यावरच आघात करण्यात येत असल्याची खंत व्यक्त करून आज देशाला रामकथेची नव्हे तर गांधी कथेची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संचालन वंदन गडकरी यांनी केले. प्रास्ताविक श्याम पांढरीपांडे यांनी केले.

.............

टॅग्स :Socialसामाजिक