शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

गजभिये हरले - पण जिंकलेही!

By admin | Updated: June 26, 2014 01:02 IST

दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी

एकत्रीकरणातून नवनेतृत्वाचा उदय : दलित राजकारणाला नवी दिशानागपूर : दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी सनदी अधिकारी दिसला व समाजही एक पाऊल पुढे एकत्र आला. राजकीय संधीसाधूंना बाजूला सारत आंबेडकरी समाजात कर्मनिष्ठ नवे नेतृत्व विकसित व्हायला सुरुवात झाली, हा या निवडणुकीने दिलेला बोध आहे. सत्तेसाठी समाजाचा वापर करणाऱ्यांना बाजूला सारून नवनेतृत्व निर्माण करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पदवीधरच्या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी समाज एकत्रीकरणाच्या पहिल्याच लढ्यात ते जिंकले आहेत. सत्ता, पद, स्वार्थासाठी कधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे फरफटत जायचे, तर कधी महायुतीत सहभागी होण्याच्या नावाखाली आपले अस्तित्व दुय्यम करून घ्यायचे. रिपाइंच्या एखाद्या गटाला हाताशी धरायचे, त्यांना पद द्यायचे व त्यांना मानणारे दलित मतदार स्वत:कडे वळवून घ्यायचे, असा प्रयोग सर्वच पक्ष करीत आले आहेत. असे प्रकार पाहून दलित समाजातील सुशिक्षित तरुणांच्या मनात एक सल निर्माण झाली. दलित तरुणांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा निर्धार केला. तो निर्धार बऱ्यापैकी वास्तवातही उतरवून दाखविला. त्यामुळे गेल्या आठ- दहा वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वावर असलेले डॉ. बबनराव तायवाडे २२ हजारावर थांबले. तर, गेल्या वर्षभरापासून समाजाला संघटित करणारे, जागृती निर्माण करणारे किशोर गजभिये हे १९ हजारावर पोहचले. या निवडणुकीने दलित, बहुजन मतदार किती एकवटला याचा प्रत्यय आला. गजभिये भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी होते. विदर्भ वैधानिक मंडळाचे पहिले सदस्य सचिव होते. विक्रीकर उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. मतदारांनी दाखवून दिली ताकदस्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी समाजाला एकत्र करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. पदवीधरच्या प्रचारात ते एकत्रीकरणाचा विचार घेऊनच उतरले. आपण ही निवडणूक आमदार होण्यासाठी नव्हे तर आंबेडकरी, शोषित, मागास समाजाला एकत्र करण्यासाठी लढत आहोत, हे त्यांनी मतदारांना पटवून दिले. मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या सुशिक्षित दलित मतदाराला त्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली. गजभिये हरले तरी वाघासारखे लढले. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांना विचार करायला लावणारी मते त्यांनी घेतली. भविष्यात दलित राजकारणाची दिशा कशी असेल याचा प्रत्यय देणारी निवडणूक आहे. या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी भविष्यात आपण एकवटलो तर काय करू शकतो याची ताकद मतदारांनी दाखवून दिली आहे. (प्रतिनिधी)