शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

गजभिये हरले - पण जिंकलेही!

By admin | Updated: June 26, 2014 01:02 IST

दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी

एकत्रीकरणातून नवनेतृत्वाचा उदय : दलित राजकारणाला नवी दिशानागपूर : दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केलेल्या राजकारणामुळे दलित समाजाचा हळूहळू त्यांच्यावरील विश्वास उडाला. त्यामुळे किशोर गजभिये यांच्या रूपात समाजाला एकवटणारा एक माजी सनदी अधिकारी दिसला व समाजही एक पाऊल पुढे एकत्र आला. राजकीय संधीसाधूंना बाजूला सारत आंबेडकरी समाजात कर्मनिष्ठ नवे नेतृत्व विकसित व्हायला सुरुवात झाली, हा या निवडणुकीने दिलेला बोध आहे. सत्तेसाठी समाजाचा वापर करणाऱ्यांना बाजूला सारून नवनेतृत्व निर्माण करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पदवीधरच्या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी समाज एकत्रीकरणाच्या पहिल्याच लढ्यात ते जिंकले आहेत. सत्ता, पद, स्वार्थासाठी कधी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे फरफटत जायचे, तर कधी महायुतीत सहभागी होण्याच्या नावाखाली आपले अस्तित्व दुय्यम करून घ्यायचे. रिपाइंच्या एखाद्या गटाला हाताशी धरायचे, त्यांना पद द्यायचे व त्यांना मानणारे दलित मतदार स्वत:कडे वळवून घ्यायचे, असा प्रयोग सर्वच पक्ष करीत आले आहेत. असे प्रकार पाहून दलित समाजातील सुशिक्षित तरुणांच्या मनात एक सल निर्माण झाली. दलित तरुणांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा निर्धार केला. तो निर्धार बऱ्यापैकी वास्तवातही उतरवून दाखविला. त्यामुळे गेल्या आठ- दहा वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वावर असलेले डॉ. बबनराव तायवाडे २२ हजारावर थांबले. तर, गेल्या वर्षभरापासून समाजाला संघटित करणारे, जागृती निर्माण करणारे किशोर गजभिये हे १९ हजारावर पोहचले. या निवडणुकीने दलित, बहुजन मतदार किती एकवटला याचा प्रत्यय आला. गजभिये भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी होते. विदर्भ वैधानिक मंडळाचे पहिले सदस्य सचिव होते. विक्रीकर उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. मतदारांनी दाखवून दिली ताकदस्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी समाजाला एकत्र करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. पदवीधरच्या प्रचारात ते एकत्रीकरणाचा विचार घेऊनच उतरले. आपण ही निवडणूक आमदार होण्यासाठी नव्हे तर आंबेडकरी, शोषित, मागास समाजाला एकत्र करण्यासाठी लढत आहोत, हे त्यांनी मतदारांना पटवून दिले. मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या सुशिक्षित दलित मतदाराला त्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली. गजभिये हरले तरी वाघासारखे लढले. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांना विचार करायला लावणारी मते त्यांनी घेतली. भविष्यात दलित राजकारणाची दिशा कशी असेल याचा प्रत्यय देणारी निवडणूक आहे. या निवडणुकीत गजभिये हरले असले तरी भविष्यात आपण एकवटलो तर काय करू शकतो याची ताकद मतदारांनी दाखवून दिली आहे. (प्रतिनिधी)