शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सामान्य रसिकांची दाद हेच गायधनी यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST

नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग ...

नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग घेत आहे, अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित होत आहेत, त्या सुधाकर गायधनी यांच्या कवितांना सामान्यांचीही तेवढीच दाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रभूषण सारख्या पुरस्कारापेक्षा सामान्य रसिकांची दाद हेच त्यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र आहे, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनी काढले.

कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ कवि सुधाकर गायधनी यांचा एक लाख रूपये आणि स्मृतिचिन्ह असा समावेश असलेला स्व. माणिकलाल गांधी स्मृती विदर्भ गौरव पुरस्कार -२०२० देऊन भावे यांच्या हस्ते सपत्निक सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत तिडके होते. ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे गिरीश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते.

समारंभादरम्यान वक्त्यांनी गायधनी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळावा, अशी भावना व्यक्त केली. तो धागा पकडून भावे म्हणाले, खऱ्या प्रतिभावंताचे सत्कार, पुरस्काराने काही अडत नाही. पाणी थोपवल्याने जसे न थांबता वाट काढते, तसे खऱ्या प्रतिभावंतांचे असते.

सत्काराला उत्तर देताना सुधाकर गायधनी म्हणाले, साहित्य ही संवादकला आहे. ती दुर्बोध असू नये. नेणिवेच्या डोहात जाताना प्रज्ञापकड मजबूत असली तर ती प्रतिभा साकारते, अन्यथा विकृत बनते. आपल्या काव्यावर बुद्ध आणि येशूचा प्रभाव असल्याचे सांगून ते म्हणाले, यामुळेच आपल्या काव्यात करुणा झळकते.

गणेश कनाटे म्हणाले, १९८० नंतर ताकदीच्या कविता निर्माण झाल्या नाही, अलिकडे कवितासंग्रह खपत नाही, ही प्रकाशकांची खंत आहे. कवितेचे हे हरविलेले बळ उभारण्यासाठी कविता आणि समीक्षकांसाठी संस्थात्मक उभारणी केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. श्रीकांत तिडके म्हणाले, गायधनी हे लययोग साधलेले कवी आहेत. त्यांच्या कविता दुर्बोधही नाहीत, सुबोधही नाहीत, मात्र सामान्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या आहेत. प्रारंभी प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे-घिये यांनी तर आभार बाळ कुलकर्णी यांनी मानले.