शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रसिकांची दाद हेच गायधनी यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST

नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग ...

नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग घेत आहे, अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित होत आहेत, त्या सुधाकर गायधनी यांच्या कवितांना सामान्यांचीही तेवढीच दाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रभूषण सारख्या पुरस्कारापेक्षा सामान्य रसिकांची दाद हेच त्यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र आहे, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनी काढले.

कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ कवि सुधाकर गायधनी यांचा एक लाख रूपये आणि स्मृतिचिन्ह असा समावेश असलेला स्व. माणिकलाल गांधी स्मृती विदर्भ गौरव पुरस्कार -२०२० देऊन भावे यांच्या हस्ते सपत्निक सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत तिडके होते. ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे गिरीश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते.

समारंभादरम्यान वक्त्यांनी गायधनी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळावा, अशी भावना व्यक्त केली. तो धागा पकडून भावे म्हणाले, खऱ्या प्रतिभावंताचे सत्कार, पुरस्काराने काही अडत नाही. पाणी थोपवल्याने जसे न थांबता वाट काढते, तसे खऱ्या प्रतिभावंतांचे असते.

सत्काराला उत्तर देताना सुधाकर गायधनी म्हणाले, साहित्य ही संवादकला आहे. ती दुर्बोध असू नये. नेणिवेच्या डोहात जाताना प्रज्ञापकड मजबूत असली तर ती प्रतिभा साकारते, अन्यथा विकृत बनते. आपल्या काव्यावर बुद्ध आणि येशूचा प्रभाव असल्याचे सांगून ते म्हणाले, यामुळेच आपल्या काव्यात करुणा झळकते.

गणेश कनाटे म्हणाले, १९८० नंतर ताकदीच्या कविता निर्माण झाल्या नाही, अलिकडे कवितासंग्रह खपत नाही, ही प्रकाशकांची खंत आहे. कवितेचे हे हरविलेले बळ उभारण्यासाठी कविता आणि समीक्षकांसाठी संस्थात्मक उभारणी केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. श्रीकांत तिडके म्हणाले, गायधनी हे लययोग साधलेले कवी आहेत. त्यांच्या कविता दुर्बोधही नाहीत, सुबोधही नाहीत, मात्र सामान्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या आहेत. प्रारंभी प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे-घिये यांनी तर आभार बाळ कुलकर्णी यांनी मानले.