शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

गाेर बंजारा साहित्य, कला अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता

By निशांत वानखेडे | Updated: March 17, 2024 17:12 IST

हरिभाऊ राठाेड, एकनाथ पवार यांच्या प्रयत्नांना यश : ‘लाेकमत’च्या माध्यमातून केला पाठपुरावा

नागपूर : आपल्या स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीने बंजारा समाज ओळखला जातो आणि बंजारा कला, संस्कृतीने भारतीय विविधतेला समृद्ध केले आहे. आता या बंजारा साहित्य, संस्कृतीचा अभ्यास व संशाेधनाला अकादमीद्वारे चालना मिळणार आहे. राज्य सरकारने बंजारा कला साहित्य अकादमीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी खासदार हरिभाऊ राठाेड व साहित्यिक एकनाथ पवार यांनी या अकादमीसाठी सातत्याने प्रयत्न केले व ‘लाेकमत’ने त्यांच्या प्रयत्नांचा पाठपुरावा केला आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून महाराष्ट्रात बंजारा भाषिक मोठ्या प्रमाणात आहे. बंजारा लोकसाहित्यातून बंजारा संस्कृतीचा इतिहास उलगडतो. स्वतंत्र बंजारा बोलीतून आज मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंधी आणि गुजराती अकादमीच्या धर्तीवर बंजारा अकादमी स्थापन करण्याची मागणी साहित्य वर्तुळातून होत होती.

सन २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा अकादमीची घोषणा केली होती. परंतु अकादमी थंडबस्त्यात पडल्याने हरिभाऊ राठोड, एकनाथ पवार यांनी राज्याचे मंत्री संजय राठाेड यांच्या पुढाकाराने पुन्हा जाेरकस प्रयत्न लावून धरले. त्याची दखल घेत राज्य शासनाने बंजारा साहित्य संस्कृती व कलाच्या संवर्धनासाठी गोर बंजारा अकादमी स्थापन करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय बंजारासाठी ऐतिहासिक ठरला. राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने शासनाने महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य बंगाली साहित्य अकादमी बरोबरच महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याच्या निर्णय घेतला.

एकनाथ पवार यांची संकल्पनाबंजारा भाषा, साहित्य, संस्कृती व कलांचे संवर्धन व्हावे, इतर भाषिकांच्या साहित्य अकादमी प्रमाणेच बंजाराचा समृद्ध वारसा अबाधित रहावे, तसेच बंजारा भाषेतून साहित्य निर्मितीला चालना मिळावी यासाठी श्रीक्षेत्र पोहरागड, भक्तीधाम येथे बंजारा साहित्य-संस्कृती अभ्यासक एकनाथ पवार यांनी बंजारा अकादमीची सर्वप्रथम संकल्पना ३० मे २०१६ रोजी मांडली होती. सभेत त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत बंजारा अकादमीची गरज व प्रारुप देखील मांडले होते. अखेर सात वर्षांनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या बंजारा भाषिकासाठी स्वतंत्र अकादमी स्थापन करण्याचा निर्णय झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.