शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

गडकरी यांच्या प्रयत्नामुळेच नागनदीला मिळणार नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 21:18 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागनदी संवर्धनाचा प्रकल्प मागील दहा वर्षापासून विचाराधीन होता. विशेष म्हणजे नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प अहवाल २०११ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरडीसी) यांच्याकडे पाठविला होता.

ठळक मुद्देमागील दहा वर्षांच्या प्रयत्नांना यश : प्रकल्पात वेळोवेळी झाला बदल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागनदी संवर्धनाचा प्रकल्प मागील दहा वर्षापासून विचाराधीन होता. विशेष म्हणजे नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प अहवाल २०११ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरडीसी) यांच्याकडे पाठविला होता. तीन वर्षानतंर ऑगस्ट २०१४ मध्ये आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी नागनदीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रकल्प आराखड्यात काही बदल करून सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. यात नागनदी व बोर नाल्याचा समावेश होता. परंतु पिवळी नदी ही नागनदीची उपनदी असल्याने या नदीचाही या प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उत्तर व मध्य नागपुरातील दूषित पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. दोन्ही नद्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. प्रकल्पाची व्यापकता वाढल्याने खर्चातही वाढ झाली. सुरुवातीला हा प्रकल्प १२५२.३२ कोटींचा होता. तो आता २४१२.६४ कोटींवर गेला.प्रकल्प आराखड्यात वेळोवेळी बदल करण्यात आला. परंतु सुरुवातीची काही वर्षे या प्रकल्पाच्या फायली फिरत होत्या. माजी महापौर व आ. प्रा.अनिल सोले यांच्या कार्यकाळात नागनदी स्वच्छता अभियानाला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या प्रस्तावाला गती आली. सुरुवातीला महापालिकेने १२५२.३२ कोटींचा नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. कें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर व दिल्ली येथे वेळोवेळी बैठकी घेऊ न प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.सुरुवातीला पर्यावरण मंत्रालयाने १२५२.३२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली होती. मात्र प्रकल्पाचा खर्च वाढल्याने व नितीन गडकरी यांनी २०१८ मध्ये सुधारित प्रकल्प आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आराखडा सादर करण्यात आला. काही महिन्यापूर्वी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय (एनआरसीडी) २४१२.६४ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाच्या आर्थिक हिश्याच्या कर्जास हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याने या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार अशी आशा आहे.