शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आदिवासींसाठी गडकरींनी चालविली ‘स्पेशल ट्रेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:26 IST

गरीबांचा कुणी वाली नसतो व त्यांच्या अडचणीत सहसा लवकर कुणी धावून येत नाही, असे साधारणत: म्हटले जाते. मात्र कचारगड यात्रेला जाण्यासाठी पहाटेपासून रेल्वे स्थानकात ताटकळत पडलेल्या शेकडो आदिवासी बांधवांना सोमवारी राजकीय व्यक्तिमत्त्वातील मायेचा ओलावा अनुभवायला मिळाला. वंचितांसाठी सामाजिक जाण जपलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सह्रद्यता दाखवत या आदिवासींना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला व रात्री उशीरा त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्यात आली.

ठळक मुद्देसकाळपासून ताटकळत असलेल्या प्रवाशांना मायेचा आधार : कचारगड यात्रेसाठी निघाले भाविक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीबांचा कुणी वाली नसतो व त्यांच्या अडचणीत सहसा लवकर कुणी धावून येत नाही, असे साधारणत: म्हटले जाते. मात्र कचारगड यात्रेला जाण्यासाठी पहाटेपासून रेल्वे स्थानकात ताटकळत पडलेल्या शेकडो आदिवासी बांधवांना सोमवारी राजकीय व्यक्तिमत्त्वातील मायेचा ओलावा अनुभवायला मिळाला. वंचितांसाठी सामाजिक जाण जपलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सह्रद्यता दाखवत या आदिवासींना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला व रात्री उशीरा त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्यात आली.गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथे दर वर्षी गोंडी धर्म दीक्षा व बडा देव महाशक्तीची पूजा होते. यात हजारोंच्या संख्येत गोंड आदिवासी सहभागी होतात. यंदा १७ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत हे आयोजन करण्यात आले असून यात्रेसाठी कचारगडकडे जाण्यासाठी सोमवारी पहाटे हजारहून अधिक नागरिक मुख्य रेल्वे स्थानकावर एकत्र आले. दरवर्षी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासन त्यांना नि:शुल्क प्रवासाची सुविधा देते. मात्र सोमवारी गरीब नागरिकांना रेल्वे प्रशासनाने धक्काच दिला. त्यांना मुख्य रेल्वेस्थानकातून रेल्वेने जाऊ देण्यात आले नाही व इतवारी रेल्वेस्थानकात जाण्यास सांगण्यात आले. हे आदिवासी पायी चालून इतवारी रेल्वेस्थानकात पोहोचले. मात्र येथेदेखील त्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी योग्य व्यवहार करण्याची तसदीदेखील दाखविली नाही. यामुळे आदिवासी नाराज झाले होते. अनेक जण तर दिवसभर तहानभुकेने व्याकूळ होऊन रेल्वेस्थानकातच बसून होते.नितीन गडकरी यांना रात्री नऊ वाजता याची माहिती कळताच त्यांनी त्वरित दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय व मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि गोंड आदिवासी बांधवांसाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले व रेल्वे प्रशासनाने त्वरित पावले उचलत विशेष ‘पॅसेंजर’ गाडी चालविली. कॉंग्रेसचे कार्यकते अ‍ॅड.अक्षय समर्थ यांनीदेखील आदिवासी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न केले.रेल्वे प्रशासनाला सूचना : बंदोपाध्यायदक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय व मध्य रेल्वेचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता नितीन गडकरी यांचा फोन आल्याचे त्यांनी सांगितले. चाचेर येथे इंजिन रुळांवरुन घसरल्यामुळे ‘डाऊन लाईन’ प्रभावित झाली होती. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होताच आदिवासी प्रवाशांसाठी इतवारी रेल्वेस्थानकातून कचारगडसाठी विशेष ‘पॅसेंजर’ गाडी चालविण्याची सूचना देण्यात आली, अशी माहिती बंदोपाध्याय यांनी दिली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीKacharagarh templeकचारगड देवस्थान