शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

गडचिरोली जिल्हा तंबाखू-दारुमुक्त करा

By admin | Updated: July 26, 2015 03:13 IST

राज्यात सुगंधी तंबाखूबंदी तसेच काही जिल्ह्यांमध्ये दारुबंदी असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

अभय बंग यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आराखडा सादरनागपूर : राज्यात सुगंधी तंबाखूबंदी तसेच काही जिल्ह्यांमध्ये दारुबंदी असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. याच मुद्यावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांचे सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेला आराखडादेखील मुख्यमंत्र्यांना सोपविण्यात आला. गडचिरोली जिल्हा हा दारू व तंबाखूमुक्त जिल्हा म्हणून विकास कार्यक्रमांतर्गत एक भाग व्हावा यावर या चर्चेत डॉ. बंग यांनी भर दिला.हैदराबाद हाऊस येथे सायंकाळी सुमारे अर्धा तास ही चर्चा झाली. राज्यात सुगंधी तंबाखूबंदी आहे. परंतु अनेक ठिकाणी सर्रासपणे नियमांना पायदळी तुडविण्यात येत असल्याचे चित्र आहे. शिवाय वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात दारुबंदी घोषित करण्यात आली आहे. परंतु येथेदेखील नियमांची पूर्ण अंमलबजावणी होत नाही व चोरीछुपे दारुविक्री सुरूच आहे याकडे डॉ.बंग यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये दारुमु्क्ती जाहीर केल्यानंतर ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर अहवाल तयार करण्यात आला आहे. हा यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सोपविला. दारुबंदीची १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने ठोस धोरण तयार करणे आवश्यक आहे अशी सूचना त्यांनी केली. नियमांची अंमलबजावणी करण्यात कर्मचाऱ्यांची संख्या हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु तंबाखू व दारुमुक्तीसाठी केवळ शासनावरच विसंबून न राहता सामाजिक चळवळदेखील उभे राहणे आवश्यक असल्याचे मत यावेळी डॉ. बंग यांनी मांडले.सोबतच गडचिरोली जिल्हा दारुमुक्त करण्यात आला असला तरी याला तंबाखूमुक्त केल्यास तेथील जनतेचे व विशेषत: महिलांचे आरोग्य सुरक्षित होऊ शकेल. शासनाने सर्व विभागांच्या सहभागासोबतच विविध संस्था तसेच संघटना व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करावा, अशी विनंती डॉ.बंग यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तंबाखूमुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यासाठी तीन वर्षांचा कार्यक्रम या आराखड्याच्या माध्यमातून बंग यांनी सादर केला. संबंधित मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. सोबतच आराखड्याचा सखोल अभ्यास करुन गडचिरोली जिल्हा तंबाखू व दारुमुक्त करण्यासंदर्भात शासनाचे धोरण जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)