शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

बीएडच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, देऊ शकणार नाही टीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:26 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची निष्काळजी व शिक्षण अध्ययन मंडळाच्या दुर्लक्षामुळे बीएडच्या विद्यार्थ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देतिसऱ्या सेमिस्टरच्या निकालाचा पता नाहीचौथ्या सेमिस्टरच्या परीक्षेचे संकट

आशीष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची निष्काळजी व शिक्षण अध्ययन मंडळाच्या दुर्लक्षामुळे बीएडच्या विद्यार्थ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. परीक्षा विभागाने बीएडच्या तिसऱ्या सेमिस्टरचे निकाल अजूनही घोषित केले नाहीत. तर अध्ययन मंडळाने चौथ्या समिस्टरच्या परीक्षेच्या आयोजनास अनुमती दिली आहे. त्यामुळे बीएडचे विद्यार्थी यावर्षीही शिक्षकांसाठी होणारी पात्रता परीक्षा (टीईटी) देऊ शकणार नाहीत. टीईटी बरोबरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) सुद्धा त्यांना देता येणार नाही.

बीएड अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आपल्या समस्येबाबत विद्यापीठात विचारणा करीत आहेत. परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२० मध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे बीएड अभ्यासक्रमाची परीक्षा होऊ शकली नव्हती. ही परीक्षा जून २०२१ मध्ये घेण्यात आली. बीएड तिसऱ्या सेमिस्टरचा अंतिम पेपर २१ जून रोजी संपला. विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात घोषित होईल. परंतु ४० दिवसांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही निकाल लागला नाही. त्याचबरोब चौथ्या सेमिस्टर परीक्षेच्या आयोजनाबाबत अजूनपर्यंत तारीख निर्धारित केली नाही.

यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बीएडच्या तिसऱ्या सेमिस्टरचे निकाल कधी घोषित होईल याबाबत स्पष्ट केले नाही. पण चौथ्या सेमिस्टर परीक्षेचे आयोजन ऑक्टोबरमध्ये होईल, असे त्यांनी सांगितले.

- दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला साडेतीन वर्ष

पूर्वी बीएडचा अभ्यासक्रम एकच वर्षाचा होता. नंतर दोन वर्षाचा अभ्यासक्रम करण्यात आला. आतापर्यंत विद्यार्थ्यांची चौथी सेमिस्टर व्हायला हवी होती. परंतु या अभ्यासक्रमाच्या बाबतीत गंभीरता नसल्याने विद्यार्थ्यांचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम साडेतीन वर्षाचा झाला आहे.

- शिक्षकांच्या नियुक्तीला दाखवावी लागेल का पाठ?

टीईटी व सीटीईटी परीक्षा देता येणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्याचबरोबर शाळा व कॉलेजमध्ये येणाऱ्या महिन्यात होणाऱ्या नियुक्त्यांनासुद्धा त्यांना पाठ दाखवावी लागणार असल्याची भीती आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता परीक्षेचे आयोजन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र