शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारात उपाययाेजनांचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण पूर्णपणे नाहिसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असताना रामटेक शहरातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमण पूर्णपणे नाहिसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असताना रामटेक शहरातील आठवडी बाजारात उपाययाेजनांचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचा हलगर्जीपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रामटेक शहरात रविवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात शहरासह परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी, शेतमजूर व नागरिक तसेच वीटभट्ट्या व इतर कामांवरील कामगार भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे या आठवडी बाजाराचे स्वरूप माेठे आहे. काेराेना संक्रमणाच्या सुरुवातीचे सहा महिने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन व साथ राेग नियंत्रण कायद्याचा आधार घेत गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजारांवर बंदी घातली हाेती. दिवाळीपासून पुन्हा आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली. यात रामटेक शहरातील आठवडी बाजाराचा समावेश आहे.

बाजारात खरेदी व विक्री करायला येणारी व्यक्ती काेराेना संक्रमित आहे की नाही, हे कळायला मार्ग नसतो. मात्र, नागरिक व दुकानदार या बाजारात मास्क न वापरता फिरत असून, खरेदी करताना दुकानांजवळ फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन देखील करीत नाही. खाेकलताना किंवा शिंकताना ताेंडावर साधा रुमालही ठेवत नसल्याचे आढळून आले आहे. वास्तवात, काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी ग्रामीण व शहरी भागात अधूनमधून काेराेना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

...

दंडात्मक कारवाई

शासनाने मध्यंतरी मास्क वापरणे अनिवार्य केले हाेते. मास्क न वापरणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जायची. ही कारवाई टाळण्यासाठी का हाेईना नागरिक विना मास्क घराबाहेर पडत नव्हते. प्रशासनाने दंडात्मक कारवाई करणे बंद करताच नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे.

....

नागरिकांनी त्यांच्या स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्कचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. कारण, काेराेनाचा धाेका पूर्णपणे टळलेला नाही. रामटेक शहरात काेराेनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे ते पुन्हा वाढू शकतात.

-बाळासाहेब मस्के,

तहसीलदार, रामटेक.