शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

अक्षय तृतीयाच्या खरेदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:24 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती.

ठळक मुद्देप्रशासनाच्या आवाहनानंतरही भाजी बाजारात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. सक्करदरा येथील बुधवारी भरणारा बाजार बंद केला आहे. परंतु रविवारी या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस विभागाचे वाहन गस्तीवर होते. लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन करीत होते. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चौकाचौकात वर्दळ होती. सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडला होता. शहरातील कॉटन मार्केटमधील भाजीबाजार बंद करून मनपा आयुक्तांनी ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्यासाठी अनेक वस्त्यांमध्ये बाजारांना परवानगी दिली. परंतु या बाजारात गर्दी होत असल्याने रेशीमबाग व राजाबाक्षा येथील बाजार बंद करावा लागला. अशीच परिस्थिती धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे भरणाऱ्या बाजारात आहे. होणाºया गर्दीमुळे परिसरातील नागरिकात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील कॉटन मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा बाजार बंद केला. येथे येणारे शेतकरी व येथील दलालांना आयुक्तांनी शहराच्या विविध भागात बाजार तयार करून व्यापाराची संधी दिली. नागरिकांनाही त्यांच्याच परिसरात भाजीपाला मिळावा, असाही आयुक्तांचा हेतू आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. दुसरीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने नागरिकात भीती वाढली आहे.बाधित भागातून येणाऱ्यांना कसे ओळखणारवस्त्यातील बाजारातूनही कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिकांच्या मनात घर केले आहे. शहरातील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. भाजीपाला खरेदीसाठी येणारे नागरिक मास्क लावून केवळ औपचारिकता पूर्ण करीत आहे. ज्या वस्त्यांना लागून बाजार सुरू करण्यात आले, तेथे विविध भागातून नागरिक येतात. त्यात कोण कुठून आले, बाधित भागातून आलेल्यांना कसे ओळखणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkshaya Tritiyaअक्षय तृतीया