शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अक्षय तृतीयाच्या खरेदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:24 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती.

ठळक मुद्देप्रशासनाच्या आवाहनानंतरही भाजी बाजारात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. सक्करदरा येथील बुधवारी भरणारा बाजार बंद केला आहे. परंतु रविवारी या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस विभागाचे वाहन गस्तीवर होते. लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन करीत होते. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चौकाचौकात वर्दळ होती. सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडला होता. शहरातील कॉटन मार्केटमधील भाजीबाजार बंद करून मनपा आयुक्तांनी ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्यासाठी अनेक वस्त्यांमध्ये बाजारांना परवानगी दिली. परंतु या बाजारात गर्दी होत असल्याने रेशीमबाग व राजाबाक्षा येथील बाजार बंद करावा लागला. अशीच परिस्थिती धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे भरणाऱ्या बाजारात आहे. होणाºया गर्दीमुळे परिसरातील नागरिकात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील कॉटन मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा बाजार बंद केला. येथे येणारे शेतकरी व येथील दलालांना आयुक्तांनी शहराच्या विविध भागात बाजार तयार करून व्यापाराची संधी दिली. नागरिकांनाही त्यांच्याच परिसरात भाजीपाला मिळावा, असाही आयुक्तांचा हेतू आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. दुसरीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने नागरिकात भीती वाढली आहे.बाधित भागातून येणाऱ्यांना कसे ओळखणारवस्त्यातील बाजारातूनही कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिकांच्या मनात घर केले आहे. शहरातील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. भाजीपाला खरेदीसाठी येणारे नागरिक मास्क लावून केवळ औपचारिकता पूर्ण करीत आहे. ज्या वस्त्यांना लागून बाजार सुरू करण्यात आले, तेथे विविध भागातून नागरिक येतात. त्यात कोण कुठून आले, बाधित भागातून आलेल्यांना कसे ओळखणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkshaya Tritiyaअक्षय तृतीया