शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
धक्कादायक! जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
3
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
4
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
5
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
6
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
7
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
8
Bombay HC: थकबाकी दिल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व नाही: हायकोर्ट
9
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
10
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
11
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
12
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
13
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
14
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
15
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
16
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
17
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
18
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
19
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
20
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीयाच्या खरेदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:24 IST

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती.

ठळक मुद्देप्रशासनाच्या आवाहनानंतरही भाजी बाजारात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. सक्करदरा येथील बुधवारी भरणारा बाजार बंद केला आहे. परंतु रविवारी या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस विभागाचे वाहन गस्तीवर होते. लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन करीत होते. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चौकाचौकात वर्दळ होती. सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडला होता. शहरातील कॉटन मार्केटमधील भाजीबाजार बंद करून मनपा आयुक्तांनी ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्यासाठी अनेक वस्त्यांमध्ये बाजारांना परवानगी दिली. परंतु या बाजारात गर्दी होत असल्याने रेशीमबाग व राजाबाक्षा येथील बाजार बंद करावा लागला. अशीच परिस्थिती धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे भरणाऱ्या बाजारात आहे. होणाºया गर्दीमुळे परिसरातील नागरिकात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील कॉटन मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा बाजार बंद केला. येथे येणारे शेतकरी व येथील दलालांना आयुक्तांनी शहराच्या विविध भागात बाजार तयार करून व्यापाराची संधी दिली. नागरिकांनाही त्यांच्याच परिसरात भाजीपाला मिळावा, असाही आयुक्तांचा हेतू आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. दुसरीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने नागरिकात भीती वाढली आहे.बाधित भागातून येणाऱ्यांना कसे ओळखणारवस्त्यातील बाजारातूनही कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिकांच्या मनात घर केले आहे. शहरातील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. भाजीपाला खरेदीसाठी येणारे नागरिक मास्क लावून केवळ औपचारिकता पूर्ण करीत आहे. ज्या वस्त्यांना लागून बाजार सुरू करण्यात आले, तेथे विविध भागातून नागरिक येतात. त्यात कोण कुठून आले, बाधित भागातून आलेल्यांना कसे ओळखणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkshaya Tritiyaअक्षय तृतीया