शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

साश्रूनयनाने अंड्रस्कर कुटुंबावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 27, 2017 01:59 IST

जुना सुभेदार लेआऊटवासीयांची सोमवारची पहाट अतिशय सुन्न करणारी ठरली. प्रत्येकाचे पाऊल अंड्रस्कर कुटुंबीयांच्या घराकडे वळली.

जुना सुभेदार लेआऊटमध्ये पसरली शोककळा : हळहळ, अश्रू आणि अलोट गर्दी, प्रशासनाची संवेदनशिलतालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना सुभेदार लेआऊटवासीयांची सोमवारची पहाट अतिशय सुन्न करणारी ठरली. प्रत्येकाचे पाऊल अंड्रस्कर कुटुंबीयांच्या घराकडे वळली. त्यांच्या घरातून बाहेर निघताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हळहळ व्यक्त होत होती. एक अख्ख कुटुंब काश्मीरच्या गुलमर्गमध्ये झालेल्या अपघातात हिरावून गेले होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अख्ख्या कुटुंबीयांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले. सुभेदार लेआऊटच्या त्या गल्लीत लोकांनी एकच गर्दी केली होती. चार पार्थिव शेवटच्या विरामाकडे जात असतानाचा प्रसंग बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. मोक्षधाम घाटावर हजारोंच्या उपस्थितीत या कुटुंबीयावर अग्निसंस्कार करण्यात आले. जयंत नामदेवराव अंड्रसकर, त्यांच्या पत्नी मनीषा, सात वर्षांची चिमुकली जान्हवी व पाच वर्षांची अनघा काश्मीरचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आठ दिवसांपूर्वी रवाना झाले होते. ते परतीच्याच मार्गावर असताना त्यांच्यावर निसर्गाची अवकृपा झाली. या अपघातात अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू झाला. जयंत अंड्रस्कर हे सात वर्षांपूर्वी दिल्ली येथे स्थायिक झाले होते. तेथे डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशन विभागात कार्यरत होते. आई-वडील व भाऊ नागपुरात राहत असल्याने, त्यांच्या पार्थिवाला नागपुरात आणण्यात आले.श्रीनगरवरून त्यांचे पार्थिव दिल्लीला आणण्यात आले. दिल्लीवरून विमानाने मुंबई आणि मुंबईवरून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चारही पार्थिव नागपूर विमानतळावर पोहोचले. या पार्थिवासोबत जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे अधिकारी पवनसिंग सोढी नागपूर विमानतळापर्यंत आले होते. झालेली घटना अतिशय दु:खद असल्याने ईदची सुटी असतानाही अख्खे जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. महापालिकेच्या अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. आणि त्यांचे पार्थिवच आलेजयंत अंड्रस्कर यांची पत्नी मनीषा यांच्या भावाचे २८ मे रोजी लग्न झाले होते. त्यावेळी जयंत, मनीषा, जान्हवी आणि अनघा नागपुरात आले होते. त्यावेळी सर्वांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. जूनच्या ३० ला मनीषा यांच्या आईचे श्राद्ध होते. काश्मीरवरून आल्यानंतर २८ जूनला ते नागपुरात परतणार होते परंतु काळ आडवा आला. सोमवारी नागपुरात पोहचलेले त्यांचे मृत पार्थिव बघून अंड्रस्कर आणि वांढरे कुटुंब शोकमग्न झाले.पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कारमोक्षधाम घाटवर एकाच वेळी आई-वडील व दोन मुलींचा अग्निसंस्कार होत असतानाचे दुर्मिळ दृश्य अनेकांनी बघितल्यावर प्रत्येकाचे काळीज फाटले होते. नीरव शांतता अख्ख्या घाटावर पसरली होती. या अंत्यसंस्काराला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत चौघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पार्थिव तीन तासापूर्वी नागपुरातदिल्ली येथून मृत पार्थिवांना मुंबई येथे आणण्यात आले. पार्थिव सोमवारी रात्री ८ वाजता इंडिगो विमानाने नागपुरात पोहोचणार होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन पार्थिव लवकरात लवकर नागपुरात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३.१५ वाजताच्या जेट एअरवेजच्या विमानाने पार्थिव नागपुरात आणण्यात आले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले की, घटनेची गंभीरता व मानवीय दृष्टिकोन लक्षात घेता, प्रशासनाने पुढाकार घेऊन ईदची सुटी असतानाही निवासी जिल्हाधिकारी के. एन. राव यांनी पार्थिव घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली.