शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

निधी दिला अन् स्थगितीही आणली; अखर्चित ७२ कोटींना जबाबदार कोण?

By गणेश हुड | Updated: June 20, 2024 21:55 IST

जिल्हा परिषदेचे राजकारण तापणार : जनसुविधांची कामे रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी), राज्य व केंद्र सरकारकडून विविध विकासकामांसाठी निधी दिला जातो. परंतु, २०२१-२२ मध्ये प्राप्त झालेला निधी खर्च करण्यास महायुती सरकारने स्थगिती दिली होती. जानेवारी २०२४ मध्ये स्थगिती उठवली. परंतु, हा निधी २८ फेब्रुवारीपर्यंत खर्च करणे शक्य न झाल्याने ३२ कोटी अखर्चित राहिले. तर २०२२-२३ या वर्षाचा निधी मार्च २०२४ मध्ये मिळाल्याने यातील ४० कोटी अखर्चित राहिले. या अखर्चित निधीवरून सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने अखर्चित निधीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेला डीपीसी, केंद्र व राज्य सरकारकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या २९७ कोटींच्या निधीपैकी २५६ कोटी रुपये खर्च झाले, तर ४० कोटींचा निधी अखर्चित राहिला. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्राप्त २४८ कोटींपैकी २१५ कोटी रुपये खर्च झाले, तर ३२ कोटींचा निधी अखर्चित राहिला. याचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे. राज्यातील सत्तांतरामुळे निधी खर्च करण्याला स्थगिती देण्यात आली. परिणामी २०२१-२२ या वर्षातील ३२ कोटींचा निधी अखर्चित राहिला. तर २०२२-२३ या वर्षाचा निधी मार्च महिन्यात मिळाल्याने ३१ मार्चपूर्वी मंजूर कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया शक्य न झाल्याने ४० कोटींचा निधी अखर्चित राहिला. दुसरीकडे जन व नागरी सुविधांच्या कामांसाठी निधीची मागणी करूनही हा निधी मिळाला नाही. परिणामी जिल्ह्यातील आवश्यक कामे रखडल्याचे जि. प.तील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी दोन आर्थिक वर्षांची मुदत असते. या मुदतीत खर्च न झाल्यास तो निधी संबधित यंत्रणांना परत करावा लागतो. जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेचा निधी डीपीसीच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या काही मंत्रालयांकडूनही थेट निधी मिळतो. तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठीही निधी मिळत असतो. २०२२-२३ चा निधी मार्च २०२४ पर्यंत खर्च करण्याला मुदत होती. तर २०२१-२२ चा निधी खर्च करण्याला २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदत होती.भाजप पदाधिकाऱ्यांची चौकशीची मागणी२०२१-२२ तसेच २०२२-२३ या दोन वर्षांत जिल्हा परिषदेला शासनाकडून प्राप्त निधीपैकी ६५ कोटी २६ लाखांचा निधी अखर्चित राहिला. जिल्हा परिषदेतील सत्तापक्ष याला जबाबदार असून, हा निधी शासनाने परत घ्यावा. निधी खर्च करण्यात अपयशी ठरल्याने जि. प.तील अधिकारी व पदाधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. अखर्चित निधी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत खर्च करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नागपूर जिल्हा महामंत्री गज्जू यादव यांनी गुरूवारी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.