शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
2
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
3
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
4
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
5
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
6
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
8
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
9
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
10
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
11
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
12
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
13
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
14
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
15
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
16
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
17
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
18
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
19
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
20
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले

औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण

By admin | Updated: September 15, 2015 06:15 IST

औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत

नागपूर : औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत भारतीय अभियंते अग्रेसर आहे. आपले काम करताना त्यांनी व्यावसायिक बांधिलकी ठेवावी, असे मत मधुकरराव पांडव कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, भंडाराचे प्राचार्य संजय मोवाडे यांनी व्यक्त केले. भारताचे महान सुपुत्र भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबरला अभियंता दिन (इंजिनिअर्स डे) साजरा करण्यात येतो. ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. अभियंत्यांनी गुणवत्ता सिद्ध करावीमोवाडे म्हणाले, जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे झाली. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय अभियंत्यांना गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे आहे. आजच्या युगात अभियंत्यांच्या स्पर्शाशिवाय तयार झालेली एकही वस्तू नाही. प्रत्येक उत्पादनामध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. जागतिक स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत भारतीय अभियंते अग्रेसर असले तरीही विकसित देशांच्या तुलनेत काही अंशाने कमी पडत असून याबाबत गुणवत्ता निर्माण करणे काळाची गरज आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात कराएम. विश्वेश्वरय्या यांची जयंती व भारताकरिता त्यांनी केलेल्या महान, उत्कृष्ट कार्याची आठवण व्हावी, यासाठी साजरा करण्यात येणारा अभियंता दिवस हा अभियंत्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यांचा साधेपणा, दूरदृष्टी, आत्मसंकल्प आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी ते परिचित होते. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत त्यांचे संशोधनात्मक कार्य डोळ्यापुढे ठेवून अभियंत्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)विश्वेश्वरय्या यांना भारतरत्नविश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी बेंगळुरू शहरापासून ४० कि़मी. अंतरावर मुद्देनाहल्ली येथे झाला. बेंगळुरूच्या मध्य कॉलेजमधून १८८१ मध्ये कला शाखेची पदवी घेतल्यानंतर पुणे येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात काही काळ नोकरी केल्यानंतर भारतीय सिंचन आयोगामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले. विश्वेश्वरय्या यांनी पूर नियंत्रणासाठी स्वयंचलित जलनियंत्रण करणारे दरवाजांचे आरेखन केले. त्यासाठी त्यांनी पेटंट घेतले. त्यांनी या पद्धतीचा अवलंब पुणे शहराजवळील खडकवासला धरणासाठी केला. त्यामुळे धरणांचे नुकसान न होता पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले. नंतर ग्वाल्हेर येथील टिग्रा धरण, म्हैसूर येथील कृष्णराज सागर येथे या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. हैदराबाद शहराला पुरापासून वाचविण्यासाठी पूर नियंत्रण प्रणाली त्यांनी विकसित केली. आशियातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या म्हैसूर येथील कृष्ण राजसागर या धरणाच्या निर्मितीच्या वेळी मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५५ मध्ये विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न हा सर्वाधिक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.