शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण

By admin | Updated: September 15, 2015 06:15 IST

औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत

नागपूर : औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत भारतीय अभियंते अग्रेसर आहे. आपले काम करताना त्यांनी व्यावसायिक बांधिलकी ठेवावी, असे मत मधुकरराव पांडव कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, भंडाराचे प्राचार्य संजय मोवाडे यांनी व्यक्त केले. भारताचे महान सुपुत्र भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबरला अभियंता दिन (इंजिनिअर्स डे) साजरा करण्यात येतो. ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. अभियंत्यांनी गुणवत्ता सिद्ध करावीमोवाडे म्हणाले, जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे झाली. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय अभियंत्यांना गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे आहे. आजच्या युगात अभियंत्यांच्या स्पर्शाशिवाय तयार झालेली एकही वस्तू नाही. प्रत्येक उत्पादनामध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. जागतिक स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत भारतीय अभियंते अग्रेसर असले तरीही विकसित देशांच्या तुलनेत काही अंशाने कमी पडत असून याबाबत गुणवत्ता निर्माण करणे काळाची गरज आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात कराएम. विश्वेश्वरय्या यांची जयंती व भारताकरिता त्यांनी केलेल्या महान, उत्कृष्ट कार्याची आठवण व्हावी, यासाठी साजरा करण्यात येणारा अभियंता दिवस हा अभियंत्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यांचा साधेपणा, दूरदृष्टी, आत्मसंकल्प आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी ते परिचित होते. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत त्यांचे संशोधनात्मक कार्य डोळ्यापुढे ठेवून अभियंत्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)विश्वेश्वरय्या यांना भारतरत्नविश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी बेंगळुरू शहरापासून ४० कि़मी. अंतरावर मुद्देनाहल्ली येथे झाला. बेंगळुरूच्या मध्य कॉलेजमधून १८८१ मध्ये कला शाखेची पदवी घेतल्यानंतर पुणे येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात काही काळ नोकरी केल्यानंतर भारतीय सिंचन आयोगामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले. विश्वेश्वरय्या यांनी पूर नियंत्रणासाठी स्वयंचलित जलनियंत्रण करणारे दरवाजांचे आरेखन केले. त्यासाठी त्यांनी पेटंट घेतले. त्यांनी या पद्धतीचा अवलंब पुणे शहराजवळील खडकवासला धरणासाठी केला. त्यामुळे धरणांचे नुकसान न होता पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले. नंतर ग्वाल्हेर येथील टिग्रा धरण, म्हैसूर येथील कृष्णराज सागर येथे या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. हैदराबाद शहराला पुरापासून वाचविण्यासाठी पूर नियंत्रण प्रणाली त्यांनी विकसित केली. आशियातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या म्हैसूर येथील कृष्ण राजसागर या धरणाच्या निर्मितीच्या वेळी मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५५ मध्ये विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न हा सर्वाधिक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.