शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नागपुरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:28 IST

शहरातील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटविण्यात आली. अपघातात झालाच तर वाहनचालकांचा बळी जाऊ नये यासाठी हेल्मेट न वापरणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. पण अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट गुरांचा शहरातील वर्दळीच्या मार्गावर मुक्त संचार सुरू आहे. याला आवर कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव असल्याने महापालिकेचा कोंडवाडा विभाग मात्र हतबल आहे.

ठळक मुद्देयंत्रणा नसल्याने कोंडवाडा विभाग हतबल : न्यायालयाच्या आदेशानंतरही ठोस कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनाागपूर : शहरातील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटविण्यात आली. अपघातात झालाच तर वाहनचालकांचा बळी जाऊ नये यासाठी हेल्मेट न वापरणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. पण अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट गुरांचा शहरातील वर्दळीच्या मार्गावर मुक्त संचार सुरू आहे. याला आवर कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव असल्याने महापालिकेचा कोंडवाडा विभाग मात्र हतबल आहे.गोपालक गाई व म्हशी सर्रास मोकाट सोडतात तसेच मोकाट सांडांचीही संख्या मोठी आहे. शहरातील उद्याने, मोकळी मैदाने व रस्त्याच्या बाजूला हिरवळ असलेल्या भागात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे. मोकाट गुरांची महापालिकेच्या कोंंडवाडा विभागाकडे तक्रार केली जाते. परंतु विभागाकडे जनावरे पकडण्यासाठी दोनच गाड्या आहेत. त्यात कर्मचारी नाही. रोजंदारीवर मजुरांना कामावर ठेवले जाते. त्यांना मोकाट जनावरे पकडण्याचा अनुभव नसतो. विभागातील रिक्त पदे मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाही. परिणाम अनेकदा तक्रार करूनही कोंडवाडा विभागाकडून जनावरांवर कारवाई होत नसल्याचा अनुभव लोकांना आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर आता महापालिका आणि दुग्ध विकास विभागाला जाग आली आहे.नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा दबावकोंडवाडा विभागाने मोकाट जनावर पकडले की त्याला सोडवण्यासाठी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे फोन येतात. राजकीय दबावामुळे पथकाला कारवाई करता येत नाही. शहरात मोकाट जनावरांची समस्या आहे. शहरातील गोठ्यावर कारवाई केली तर राजकीय दबाव येतो. त्यामुळे आम्हाला कारवाई करता येत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याने मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर आली जागदुग्ध विकास विभागाने वर्दळीच्या भागातही गोठ्यांना परवानगी दिली आहे. तसेच परवानगी न घेताही मोठ्याप्रमाणात गोठे आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा गोठे मालकांना दुग्ध विकास विभागाने नोटीस बजावण्याला सुरुवात केली आहे. परंतु नोटीस बजावल्यानंतर पुढे कारवाई करणार की नाही, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.हजाराहून अधिक गोठेनागपूर शहरात जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी ४५७ गोठ्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु प्रत्यक्षात गोठ्यांची संख्या हजाराहून अधिक आहे. धरमपेठ भागात शहरात सर्वाधिक १८८ गोठे असून त्यानतंर १३३ गोठे आशीनगर झोनमध्ये आहेत. लकडगंजमध्ये ११७ आणि लक्ष्मीनगरमध्ये ११५ गोठे आहेत. सर्वात कमी ६२ गोठे नेहरूनगरमध्ये आहेत. परवानगी न घेता सुरू असलेल्या गोठ्यांची संख्या याहून अधिक आहे.अंतर्गत भागातही जनावरांची समस्यामुख्य रस्त्यांसोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. रात्रीच्या सुमारास अंधारात कामावरून परतणाऱ्यांना अपघात होण्याचा धोका असतो. मोकाट जनावरांमुळे अपघात झाल्यास याबाबतची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या