शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

उपराजधानीत वजनांमध्ये सर्रास हेराफेरी ; ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:41 IST

लोकमत प्रतिनिधीने नागपुरातील सर्वच भाजीपाला बाजारपेठांची पाहणी केली. ग्राहकांना वस्तू वा भाजीपाला मोजून देताना जवळपास २० टक्के विक्रेत्यांच्या वजनकाट्यावर दगड ठेवल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देमापात पापकिलोभराची भाजी तीन पाववैधमापनशास्त्र विभाग करतो काय?

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वाधिक ग्राहकांना फसविले जाणारे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. वजनांची हेराफेरी आणि तराजूत लोखंडी वजनाऐवजी दगड ठेवून ग्राहकांची खुलेआम फसवणूक होणारे हे ठिकाण. ग्राहक सर्रास लुटले जात असताना बाजारातील विक्रेत्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. याकरिता ग्राहक वैधमापनशास्त्र विभागाला जबाबदार धरले तर ते दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवितात. शासकीय संस्थांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भानगडीत ग्राहकांचे उघड्यांवर खिसे कापले जातात. ‘मापात पाप’ या संकेतानुसार ग्राहकांची दररोज लाखो रुपयांची लूट होत आहे.लोकमत प्रतिनिधीने नागपुरातील सर्वच भाजीपाला बाजारपेठांची पाहणी केली. ग्राहकांना वस्तू वा भाजीपाला मोजून देताना जवळपास २० टक्के विक्रेत्यांच्या वजनकाट्यावर दगड ठेवल्याचे दिसून आले. विचारणा केली असता, कुणीही तपासणी करीत नाही मग भीती कशाला? असा सवाल विक्रेत्यानेच प्रतिनिधीला केला. यावरून वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित आणि आठवडी बाजारातील विक्रेत्यांच्या वजनमापांची कधीच तपासणी न केल्याचा प्रत्यय आला. इलेक्ट्रॉनिक काटे शासनाने बंधनकारक केले असतानाही विक्रेते आताही तराजूचा काटा वापरतात. याकडे कुणाचेही लक्षदिसून आले नाही. विभागाने आठवडी बाजाराची तपासणी केल्यास विक्रेत्यांमध्ये भीती निर्माण होईल आणि ग्राहकांची कधीच फसवणूक होणार नाही, असे ग्राहकाने सांगितले.आठवडी बाजार महाल, सदरचा असो वा सोमवारीपेठेतील येथे ग्राहक खुलेआम लुटला जातो आहे. वस्तू दगडाच्या वजनांनी मोजणे, वजनात हेराफेरी, काटा मारणे, प्रमाणित वजनाचा उपयोग न करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. हेराफेरीत ग्राहकांना किलोभराची भाजी तीन पाव मिळत आहे. ग्राहकांनाही याची माहिती आहे. मात्र दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही, त्यामुळे ग्राहकांची मुस्कटदाबी होत आहे.महापालिका क्षेत्रात १० झोनमध्ये २६ अधिकृत बाजार तर ४० पेक्षा जास्त अनधिकृत बाजार आहेत. महापालिका बाजारातील विक्रेत्यांकडून ठराविक रक्कम आकारते. मात्र वजनकाटे तपासणी करण्याची जबाबदारी वैधमापनशास्त्र विभागाकडे आहे. असे असतानाही विभागाकडून ग्राहकांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही उपाययोजना होत नाही वा आकस्मिक तपासणी केली जात नाही. त्यामुळे विक्रेत्यांच्या मनमानीला सजग ग्राहकही बळी पडतो. विके्रत्याला ग्राहकांनी विरोध केल्यास तू तू-मै मै करण्याची वेळ येते. त्यामुळे दररोज आठवडी बाजारात ग्राहक लाखो रुपयांनी फसविला जात आहे. विक्रेत्यांची हातचलाखी रोखण्यासाठी वैधमापन विभागाने बाजारावर धाडी टाकाव्यात. विक्रेत्यांना दंडित करावे, अशी ग्राहकांची मागणी जोर धरू लागली आहे.

कॉटन मार्केटमध्ये काट्यांवर दगडकॉटन मार्केट भाजीपाला बाजारात बहुतांश विक्रेते दगडांच्या मापाने भाजीपाल्याचे मोजमाप करतात. विचारणा केली असता त्यांनी घमेल्या पासन म्हणून दगड ठेवल्याचे सांगितले आणि वजनाची शहानिशा करून दिली. ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांची समजूत घालतो. भाजीपाल्याचे वजन करताना दगड वजन काट्यात ठेवतो. ही वर्षानुवर्षे चालत आलेली बाजाराची पद्धत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कुणाचीही फसवणूक होणार नाही, यावर आम्ही दक्ष असतो. ग्राहकाने खरेदी केलेला भाजीपाला कुठेही मोजावा, वजन कमी मिळणार नाही, असे विक्रेत्याने ठासून सांगितले. याच बाजारात काही विक्रेते इलेक्ट्रॉनिक्स काट्याचा वापर करीत असल्याचे दिसून आले. ग्राहकांना तंतोतंत माप देण्याचे आमचे धोरण असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा