शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

संकटमोचनाच्या दर्र्शनाच्या लालसेने फसवणूक

By admin | Updated: May 13, 2016 03:17 IST

हनुमानजींचे दर्शन घडवितो, असे सांगून एका युवकाचे अडीच हजार रुपये आणि मोबाईलसह १२,५०० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांनी लंपास केला.

नागपूर : हनुमानजींचे दर्शन घडवितो, असे सांगून एका युवकाचे अडीच हजार रुपये आणि मोबाईलसह १२,५०० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांनी लंपास केला. सीताबर्डीतील जगदीश सावजी भोजनालयाजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. वैभव दीपक खवशी (वय १७) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कारंजा घाडगे (जि. वर्धा) येथील रहिवासी असून, नागपुरात तो पीएमटीचे क्लासेस करतो. नेहमीप्रमाणे वैभव क्लास आटोपून बुधवारी सायंकाळी ६.४५च्या सुमारास जगदीश सावजी जवळून जात होता. त्याला एका जणाने थांबवले. आपल्या मारवाडी मित्राने येथे नवीन शोरूम लावले. ते कुठे आहे, अशी विचारणा केली. पत्ता माहित नसल्याचे सांगून वैभव जायला निघाला. तेवढ्यात दुसरा एक त्याच्याजवळ निघाला. आपण हरिद्वारवरून आलो आहे. तू काही दान करू शकतो काय, अशी विचारणा त्याने केली. वैभवने त्याला १० रुपये दिले असता त्याने हातचलाखी करून ५० ची नोट परत केली. ‘तुझे पैसे नको, आपल्याला सिद्धी प्राप्त असून, तू जास्त पैसे ठेवल्यास जास्त रक्कम तुला मिळेल असेही आरोपी म्हणाला. वैभवने काही विचारण्यापूर्वीच पहिल्या आरोपीने तुला सिद्धी प्राप्त असल्याचा काय पुरावा आहे‘, अशी दुसऱ्याकडे विचारणा केली. त्यावर तुमच्या मनात काय सुरू आहे,असे मी ओळखू शकतो, असे दुसऱ्या आरोपीने सांगितले. त्यानंतर वैभवला पहिल्या आरोपीने बाजूला नेले आणि तू कोणत्या देवाला मानतो, असे विचारले.वैभवने बजरंगबलीचे नाव घेताच पहिला आरोपी दुसऱ्याजवळ आला. सांग आमच्या मनात कोणता देव आहे,असे विचारले. तुम्ही दोघे बजरंगबलीला मानता, असे सांगून, तुम्हाला लगेच हनुमानजींचे दर्शन घडवतो, असेही आरोपी म्हणाला. त्यानंतर पहिल्या आरोपीला दुसऱ्याने २१ पावलं पुढे जा, तुला दर्शन घडेल, असे म्हटले. त्यानुसार, पहिला आरोपी काही पावल. पुढे गेला आणि धावतच मागे परतला. त्याने दुसऱ्या आरोपीच्या पायावर लोटांगण घातले. आपल्याला समोर लख्ख प्रकाश दिसला अन् वेगळ्या सुखाची अनुभूती आल्याचे तो म्हणाला’, ते ऐकून वैभवही भारावला. आरोपीच्या सांगण्यानुसार, जवळचे २५०० रुपये आणि मोबाईल तसेच घड्याळ रुमालात काढून ते आरोपींच्या जवळ ठेवले अन् २१ पावलं पुढे गेला. मागे परत आला तेव्हा दोन्ही भामटे गायब होते. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने वैभवने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)एटीएममधून काढले पैसेवैभवला गंडा घालणारे दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत नाही, असे दाखवत होते. पहिला आरोपी दुसऱ्यावर अविश्वास दाखवत होता. ही बनवाबनवी करतानाच शेवटच्या घटकेला रक्कम (१० रुपयांचे ५० रुपये) मिळणार म्हणून त्याने वैभवला एटीएममधून २५०० रुपये काढायला लावले. अर्ध्या-पाऊण तासाच्या कालावधीत संमोहन केल्याप्रमाणे वैभवही आरोपींच्या मनासारखाच वागू लागला होता. दरम्यान, २५०० रुपये, १० हजारांचा मोबाईल अन् घड्याळ घेऊन आरोपींनी पलायन केल्यानंतर वैभव ठाण्यात पोहचला. त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार, सीताबर्डीचे पोलीस उपनिरीक्षक के. आर. गवई यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.