शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

संकटमोचनाच्या दर्र्शनाच्या लालसेने फसवणूक

By admin | Updated: May 13, 2016 03:17 IST

हनुमानजींचे दर्शन घडवितो, असे सांगून एका युवकाचे अडीच हजार रुपये आणि मोबाईलसह १२,५०० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांनी लंपास केला.

नागपूर : हनुमानजींचे दर्शन घडवितो, असे सांगून एका युवकाचे अडीच हजार रुपये आणि मोबाईलसह १२,५०० रुपयांचा मुद्देमाल दोन भामट्यांनी लंपास केला. सीताबर्डीतील जगदीश सावजी भोजनालयाजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. वैभव दीपक खवशी (वय १७) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कारंजा घाडगे (जि. वर्धा) येथील रहिवासी असून, नागपुरात तो पीएमटीचे क्लासेस करतो. नेहमीप्रमाणे वैभव क्लास आटोपून बुधवारी सायंकाळी ६.४५च्या सुमारास जगदीश सावजी जवळून जात होता. त्याला एका जणाने थांबवले. आपल्या मारवाडी मित्राने येथे नवीन शोरूम लावले. ते कुठे आहे, अशी विचारणा केली. पत्ता माहित नसल्याचे सांगून वैभव जायला निघाला. तेवढ्यात दुसरा एक त्याच्याजवळ निघाला. आपण हरिद्वारवरून आलो आहे. तू काही दान करू शकतो काय, अशी विचारणा त्याने केली. वैभवने त्याला १० रुपये दिले असता त्याने हातचलाखी करून ५० ची नोट परत केली. ‘तुझे पैसे नको, आपल्याला सिद्धी प्राप्त असून, तू जास्त पैसे ठेवल्यास जास्त रक्कम तुला मिळेल असेही आरोपी म्हणाला. वैभवने काही विचारण्यापूर्वीच पहिल्या आरोपीने तुला सिद्धी प्राप्त असल्याचा काय पुरावा आहे‘, अशी दुसऱ्याकडे विचारणा केली. त्यावर तुमच्या मनात काय सुरू आहे,असे मी ओळखू शकतो, असे दुसऱ्या आरोपीने सांगितले. त्यानंतर वैभवला पहिल्या आरोपीने बाजूला नेले आणि तू कोणत्या देवाला मानतो, असे विचारले.वैभवने बजरंगबलीचे नाव घेताच पहिला आरोपी दुसऱ्याजवळ आला. सांग आमच्या मनात कोणता देव आहे,असे विचारले. तुम्ही दोघे बजरंगबलीला मानता, असे सांगून, तुम्हाला लगेच हनुमानजींचे दर्शन घडवतो, असेही आरोपी म्हणाला. त्यानंतर पहिल्या आरोपीला दुसऱ्याने २१ पावलं पुढे जा, तुला दर्शन घडेल, असे म्हटले. त्यानुसार, पहिला आरोपी काही पावल. पुढे गेला आणि धावतच मागे परतला. त्याने दुसऱ्या आरोपीच्या पायावर लोटांगण घातले. आपल्याला समोर लख्ख प्रकाश दिसला अन् वेगळ्या सुखाची अनुभूती आल्याचे तो म्हणाला’, ते ऐकून वैभवही भारावला. आरोपीच्या सांगण्यानुसार, जवळचे २५०० रुपये आणि मोबाईल तसेच घड्याळ रुमालात काढून ते आरोपींच्या जवळ ठेवले अन् २१ पावलं पुढे गेला. मागे परत आला तेव्हा दोन्ही भामटे गायब होते. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने वैभवने सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)एटीएममधून काढले पैसेवैभवला गंडा घालणारे दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत नाही, असे दाखवत होते. पहिला आरोपी दुसऱ्यावर अविश्वास दाखवत होता. ही बनवाबनवी करतानाच शेवटच्या घटकेला रक्कम (१० रुपयांचे ५० रुपये) मिळणार म्हणून त्याने वैभवला एटीएममधून २५०० रुपये काढायला लावले. अर्ध्या-पाऊण तासाच्या कालावधीत संमोहन केल्याप्रमाणे वैभवही आरोपींच्या मनासारखाच वागू लागला होता. दरम्यान, २५०० रुपये, १० हजारांचा मोबाईल अन् घड्याळ घेऊन आरोपींनी पलायन केल्यानंतर वैभव ठाण्यात पोहचला. त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार, सीताबर्डीचे पोलीस उपनिरीक्षक के. आर. गवई यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.