शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:26 IST

चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे५२ वा अभियंता दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.दि इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनियर्सच्या नागपूर केंद्रातर्फे रविवारी ५२ वा अभियंता दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते ‘बदल घडविण्यासाठी अभियांत्रिकी’ विषयावर बोलत होते. कार्यक्रम उत्तर अंबाझरी रोडवरील केंद्राच्या सभागृहात झाला. केंद्राचे अध्यक्ष डॉ. आर. एल. श्रीवास्तव व सचिव डॉ. एम. एस. कडू व्यासपीठावर उपस्थित होते. तंत्रज्ञान शाश्वत व पर्यावरणाला नुकसानकारक असे दोन प्रकारचे असते. तिसरी व चौथी औद्योगिक क्रांती घडवून आणणारे तंत्रज्ञान पर्यावरणाला नुकसानकारक आहे. अभियंत्यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक नावीन्यपूर्ण शोधामागे अभियंत्याचे डोके असते.औद्योगिक क्रांती अभियंत्यांमुळेच झाली आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीने माणसांची जागा यंत्रांनी घेतली. त्यानंतरच्या औद्योगिक क्रांतींनी विमाने, संगणक, इंटरनेट, मोबाईल, रोबोट इत्यादीचा अविष्कार झाला. बदल काळाची गरज आहे. परंतु, बदल शाश्वत असायला हवा असेही डॉ. अग्निहोत्री यांनी सांगितले. अन्य मान्यवरांनीदेखील समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमात अभियंते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :environmentपर्यावरण