शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:21 IST

नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‘एचएसआरपी’च्या या गोंधळामुळे लाखो ‘आरसी’ प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देहाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा गोंधळ : आरटीओ कार्यालयांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‘एचएसआरपी’च्या या गोंधळामुळे लाखो ‘आरसी’ प्रलंबित आहेत. नागपुरात याची संख्या चार हजारावर आहे. याला गंभीरतेने दखल घेत आरटीओ, नागपूर (ग्रामीण) कार्यालयाने सोमवारी वाहन विक्रेत्यांची बैठक घेऊन तातडीने ‘वाहन प्रणाली’मध्ये नंबरप्लेटसह बारकोड अपलोड करण्याचा सूचना दिल्या आहेत. तर आरटीओ, नागपूर (शहर) कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांना वाहन विक्रेत्यांकडे जाऊन समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत.विशेष म्हणजे,‘लोकमत’ने ‘विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर’ या मथळ्याखाली २९ जून रोजी वृत्त प्रसिद्ध करून सुरक्षेच्या नावावर गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आणल्याने खळबळ उडाली आहे.वाहन चोरी, वाहन अपघात व गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’ महत्त्वाची ठरणार आहे. एप्रिलपासून उत्पादित होणाºया सर्व नव्या वाहनांना ही नंबरप्लेट लावली जाणार होती. त्यानुसार संबंधित वाहनाच्या कंपनीला वाहन विक्रेत्याकडून नंबरप्लेटचा नंबर मिळताच, कंपनी सेवापुरवठादाराकडून ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ तयार करून वाहन विक्रेत्याकडे पाठविणार होती. विक्रेता संबंधित वाहनाला नंबरप्लेट लावून देणार होते. परंतु या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने व सेवापुरवठादाराकडून तातडीने नंबरप्लेट मिळत नसल्याने, विना नंबरप्लेटच्या वाहनाची संख्या राज्यात लाखोंवर गेली. नागपुरात हीच संख्या शेकडोवर आहे. धक्कादायक म्हणजे, सेवापुरवठादाराकडून ‘एचएसआरपी’सोबतच मिळालेला बारकोड हा वाहन विक्रेत्यांना ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर ‘अपलोड’ करायचा आहे. त्यानंतरच आरटीओ कार्यालय संबंधित वाहनाचे ‘रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट’ (आरसी) तयार करणार होते. परंतु याकडे वाहन विक्रेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने, शहरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून चार हजारावर आरसी प्रलंबित पडल्या आहेत.‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणताच आरटीओ ग्रामीण कार्यालयाने सोमवारी वाहन विक्रेत्यांची बैठक बोलावून ‘एचएसआरपी’ ची तातडीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. तर आरटीओ शहर कार्यालयाने निरीक्षकांना वाहन विक्रेत्यांना भेट देऊन ‘अपलोड’ची समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर