शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:21 IST

नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‘एचएसआरपी’च्या या गोंधळामुळे लाखो ‘आरसी’ प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देहाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा गोंधळ : आरटीओ कार्यालयांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‘एचएसआरपी’च्या या गोंधळामुळे लाखो ‘आरसी’ प्रलंबित आहेत. नागपुरात याची संख्या चार हजारावर आहे. याला गंभीरतेने दखल घेत आरटीओ, नागपूर (ग्रामीण) कार्यालयाने सोमवारी वाहन विक्रेत्यांची बैठक घेऊन तातडीने ‘वाहन प्रणाली’मध्ये नंबरप्लेटसह बारकोड अपलोड करण्याचा सूचना दिल्या आहेत. तर आरटीओ, नागपूर (शहर) कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांना वाहन विक्रेत्यांकडे जाऊन समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत.विशेष म्हणजे,‘लोकमत’ने ‘विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर’ या मथळ्याखाली २९ जून रोजी वृत्त प्रसिद्ध करून सुरक्षेच्या नावावर गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आणल्याने खळबळ उडाली आहे.वाहन चोरी, वाहन अपघात व गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’ महत्त्वाची ठरणार आहे. एप्रिलपासून उत्पादित होणाºया सर्व नव्या वाहनांना ही नंबरप्लेट लावली जाणार होती. त्यानुसार संबंधित वाहनाच्या कंपनीला वाहन विक्रेत्याकडून नंबरप्लेटचा नंबर मिळताच, कंपनी सेवापुरवठादाराकडून ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ तयार करून वाहन विक्रेत्याकडे पाठविणार होती. विक्रेता संबंधित वाहनाला नंबरप्लेट लावून देणार होते. परंतु या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने व सेवापुरवठादाराकडून तातडीने नंबरप्लेट मिळत नसल्याने, विना नंबरप्लेटच्या वाहनाची संख्या राज्यात लाखोंवर गेली. नागपुरात हीच संख्या शेकडोवर आहे. धक्कादायक म्हणजे, सेवापुरवठादाराकडून ‘एचएसआरपी’सोबतच मिळालेला बारकोड हा वाहन विक्रेत्यांना ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर ‘अपलोड’ करायचा आहे. त्यानंतरच आरटीओ कार्यालय संबंधित वाहनाचे ‘रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट’ (आरसी) तयार करणार होते. परंतु याकडे वाहन विक्रेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने, शहरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून चार हजारावर आरसी प्रलंबित पडल्या आहेत.‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणताच आरटीओ ग्रामीण कार्यालयाने सोमवारी वाहन विक्रेत्यांची बैठक बोलावून ‘एचएसआरपी’ ची तातडीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. तर आरटीओ शहर कार्यालयाने निरीक्षकांना वाहन विक्रेत्यांना भेट देऊन ‘अपलोड’ची समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर