शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मनपात चार सदस्यीय प्रभाग, १५१ नगरसेवकही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 10:37 IST

प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या निर्देशाची प्रतीक्षा; प्रभाग रचना नव्याने होण्याची शक्यता

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे आता नागपूर महापालिकेची निवडणूक ही २०१७ च्या चार सदस्यीय पद्दतीनेच होईल. १५६ पर्यंत वाढविण्यात आलेली नगरसेवकांची संख्याही पुन्हा १५१ होईल. प्रभाग रचना मात्र नव्याने होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या निर्णयानुसार २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी, तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. तसेच २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त महापालिका सदस्याची संख्या वाढणार आहे. ३१ मे २०२२ च्या मतदार यादीनुसार नागपूर शहरातील लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढण्याला संधी नाही.

पाच जणांची संधी हुकली

तीन सदस्यीय प्रभाग रचनेत ५२ प्रभागातून १५६ नगरसेवक निवडून जाणार होते. म्हणजेच २०१७ च्या तुलनेत पाच नगरसेवक वाढणार होते. मात्र, आता चार सदस्यीय प्रभागानुसार ३८ प्रभागांतून १५१ नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे पाच नवीन नगरसेवकांची संधी हुकणार आहे.

ओबीसीच्या जागा पुन्हा घटणार

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत १५१ सदस्यांत ओबीसींच्या ४१ जागा होत्या. ओबीसी आरक्षणाची टक्केवारी घटल्याने तीन सदस्यीय प्रभाग रचनेत सदस्यांची संख्या वाढून १५६ झाली असतानाही ओबीसी संदस्यांची संख्या मात्र कमी होऊन ३५ झाली होती. आता १५१ सदस्यांत ओबीसीच्या जागा पुन्हा घटतील. या प्रवर्गासाठी ३३ जागा आरक्षित राहतील, असा अंदाज आहे.

महिला आरक्षणाची पुन्हा सोडत

२०११ च्या लोकसंख्येनुसारच सामाजिक आरक्षण निश्चित केले जाईल. त्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जवळपास कायम राहील. ओबीसींच्या जागा आधीच्या तुलनेत कमी होतील. या तीन्ही संवर्गांसह खुल्या संवर्गातील जागांसाठीही महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे.

चारच्या प्रभागांवर नागरिकांची नाराजी

चार सदस्यीय प्रभागात अनेक नगरसेवक प्रभागाकडे फिरकले नाहीत, विकास कामांबाबत एकमेकांकडे टोलवाटोलवी केली, अशी नागरिकांची नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्सीय प्रभाग रचना केली असता त्यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. एक किंवा दोन सदस्सीय पद्धतीने निवडणूक झाली तर नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे सोपे होते, असे नागरिकांचे म्हणणे होते. पण आता पुन्हा चारचा प्रभाग झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर