शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनपात चार सदस्यीय प्रभाग, १५१ नगरसेवकही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 10:37 IST

प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या निर्देशाची प्रतीक्षा; प्रभाग रचना नव्याने होण्याची शक्यता

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे आता नागपूर महापालिकेची निवडणूक ही २०१७ च्या चार सदस्यीय पद्दतीनेच होईल. १५६ पर्यंत वाढविण्यात आलेली नगरसेवकांची संख्याही पुन्हा १५१ होईल. प्रभाग रचना मात्र नव्याने होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या निर्णयानुसार २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी, तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. तसेच २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त महापालिका सदस्याची संख्या वाढणार आहे. ३१ मे २०२२ च्या मतदार यादीनुसार नागपूर शहरातील लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढण्याला संधी नाही.

पाच जणांची संधी हुकली

तीन सदस्यीय प्रभाग रचनेत ५२ प्रभागातून १५६ नगरसेवक निवडून जाणार होते. म्हणजेच २०१७ च्या तुलनेत पाच नगरसेवक वाढणार होते. मात्र, आता चार सदस्यीय प्रभागानुसार ३८ प्रभागांतून १५१ नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे पाच नवीन नगरसेवकांची संधी हुकणार आहे.

ओबीसीच्या जागा पुन्हा घटणार

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत १५१ सदस्यांत ओबीसींच्या ४१ जागा होत्या. ओबीसी आरक्षणाची टक्केवारी घटल्याने तीन सदस्यीय प्रभाग रचनेत सदस्यांची संख्या वाढून १५६ झाली असतानाही ओबीसी संदस्यांची संख्या मात्र कमी होऊन ३५ झाली होती. आता १५१ सदस्यांत ओबीसीच्या जागा पुन्हा घटतील. या प्रवर्गासाठी ३३ जागा आरक्षित राहतील, असा अंदाज आहे.

महिला आरक्षणाची पुन्हा सोडत

२०११ च्या लोकसंख्येनुसारच सामाजिक आरक्षण निश्चित केले जाईल. त्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जवळपास कायम राहील. ओबीसींच्या जागा आधीच्या तुलनेत कमी होतील. या तीन्ही संवर्गांसह खुल्या संवर्गातील जागांसाठीही महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे.

चारच्या प्रभागांवर नागरिकांची नाराजी

चार सदस्यीय प्रभागात अनेक नगरसेवक प्रभागाकडे फिरकले नाहीत, विकास कामांबाबत एकमेकांकडे टोलवाटोलवी केली, अशी नागरिकांची नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्सीय प्रभाग रचना केली असता त्यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. एक किंवा दोन सदस्सीय पद्धतीने निवडणूक झाली तर नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे सोपे होते, असे नागरिकांचे म्हणणे होते. पण आता पुन्हा चारचा प्रभाग झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर