शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दर दिवसाला चार मुली-महिला होत आहेत ‘गायब’

By योगेश पांडे | Updated: May 16, 2023 08:00 IST

Nagpur News मागील चार महिन्यांत नागपुरातून नऊशेहून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या.

 

योगेश पांडे

नागपूर : मागील चार महिन्यांत नागपुरातून नऊशेहून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या. आकडेवारीनुसार या कालावधीत साडेचारशेहून अधिक मुली किंवा महिला बेपत्ता झाल्या व याची दिवसाची सरासरी चार मुली किंवा महिला इतकी होती. या संख्येकडे लक्ष टाकले असता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ९१२ लोक हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४७१ महिला होत्या. त्यातही १८ वर्षे किंवा त्याहून कमी वय असलेल्या मुलींचा आकडा चिंताजनक आहे. चार महिन्यांत ३६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील बहुतांश मुली घरातून निघून गेल्या होत्या. घरातून निघून जाण्याची वेगवेगळी कारणे होती.

 

बेपत्ता होण्याची प्रमुख कारणे

- प्रेमप्रकरण

- पैशांची चिंता

- घरात होणारे वाद

- अभ्यास किंवा लग्नासाठी दबाव

- नातेवाइकांशी झालेले भांडण

- घरातील वातावरण

- घरात होणारा छळ

- आजारपणाचा त्रास

- बाहेरील जगाचे आकर्षण

 

विसंवाद, अनावश्यक दबाव ठरतोय धोकादायक

सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने काही मुली प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकतात. तर अनेक मुली घरच्यांच्या दबावाला घाबरून घर सोडतात. अल्पवयीन मुलींशी पालकांनी योग्य संवाद साधणे अत्यावश्यक असते. त्यांचे मित्रमैत्रिणी, इतर सहकारी यांची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट खटकली तर त्यांना विश्वासात घेऊन विचारणे योग्य ठरते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वयात अनावश्यक दबाव टाकणे टाळले पाहिजे.

२० महिला तर मुलांसह बेपत्ता

‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांत २० महिला या त्यांच्या लहान मुला-मुलींसह बेपत्ता झाल्या. या सर्वच महिला विविध कारणांमुळे घरातून निघून गेल्या. गृहकलह, सासरच्यांकडून होणारा छळ, नवऱ्याकडून होणारा त्रास ही यामागची प्रमुख कारणे होती.

 

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करी