शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

मिहानमधील चार कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भरधाव वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील पाचपैकी चौघांचा करुण अंत झाला. वर्धा मार्गावरील खापरी-मिहान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भरधाव वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील पाचपैकी चौघांचा करुण अंत झाला. वर्धा मार्गावरील खापरी-मिहान पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये कारचालकासह दोन तरुणींचाही समावेश आहे. ते सर्वच्या सर्व मिहानमधील एक्झावेअर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कर्मचारी होते.

गुरुवारी डे-नाईट शिफ्ट आटोपल्यानंतर मध्यरात्री १ वाजता ते आपल्या घराकडे निघाले. मिहानमधील बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांना कंत्राट दिले आहे. अशाच एका वाहनातून (अर्टिका - एमएच ३१ - एटी २५९६) पीयूष टेकाडे (वय २५, रा. कोराडी रोड, नागपूर), नेहा गजभिये (वय २५, रा. वंजारी ले-आऊट, उप्पलवाडी, कामठी रोड), पायल कोचे (वय २७, रा. महेंद्रनगर, टेका), आशीष सरनायक (वय २७, रा. चक्रधरनगर, बोखारा) हे चार कर्मचारी आपल्या घराकडे निघाले. बालचंद्र उईके (वय ३४, रा. काचोरेनगर, चिंचभवन) हा वाहन चालवित होता. वाहनाची गती जास्त होती. अशात वेगात समोरून येणाऱ्या एका अवजड वाहनचालकाने अर्टिकाला जोरदार धडक मारली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बऱ्याच दूरपर्यंत त्याचा आवाज आला. कारच्या समोरचा भाग पुरता चक्काचूर झाला होता. वाहनचालकासह पाचही जण कारमध्येच चेंदामेंदा झाल्यासारखी अडकून पडले.

दरम्यान, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहनेही तेथे थांबली. माहिती कळताच कंपन्यांचे अधिकारी, सोनेगाव पोलीस तसेच गस्तीवरील पोलिसांचा ताफाही धावला. कसे बसे सर्व जखमींना बाहेर काढून मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आशीष सरनायक वगळता सर्वांना मृत घोषित केले. सचिन बबन सुटे (वय ३९, रा. शताब्दी चौक) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला.

---

बळी घेणारा कोण?

या चाैघांचे बळी कोणत्या वाहनचालकाने घेतले, ते शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रक-टिप्पर चालकाने ही धडक दिल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप तसे काहीही स्पष्ट झाले नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोणत्या वाहनाने धडक दिली त्याचा आम्ही शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी लोकमतला सांगितले.

----

मिहानमध्ये शोककळा

या अपघातामुळे मिहान परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातापूर्वी हे सर्व कर्मचारी हसत खेळत आपल्या सहकाऱ्यांना निरोप देऊन वाहनात बसले. काही वेळेतच त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त कंपनीत पसरले अन् सर्वांना जोरदार धक्का बसला.

----